जालना सहल प्रकरण : बेरक्याच्या बातमीची वरिष्ठाकडून दखल

जालना - भाजप प्रदेशाध्यक्षानी प्रायोजित केलेल्या मर्जीतल्या 5 पत्रकारांच्या सहपरिवार विमान सहलीची बातमी 'बेरक्या'ने प्रसिद्ध करताच, 'त्या' दैनिकाचे व्यवस्थापन खडबडुन जागे झाले आहे. या बातमीची जालना शहर व जिल्ह्यात जोरदार चर्चा असून, 'बेरक्या'ची बातमी whatsaap व facebook वरून दोन दिवसापासून फिरत असून ही पोस्ट व्हायलर झाली आहे.
'बेरक्या' च्या बातमीची दखल घेऊन काल रविवारीच महाराष्ट्रातल्या सर्वाधिक खपाच्या दैनिकाच्या औरंगाबाद येथील संपादकांनी जालना येथील विमानाने सहल केलेल्या बातमीदारास काम थांबविण्याचे आदेश दिले होते. आज सकाळीच 11 वाजता औरंगाबादला जावून या बातमीदाराने संपादकांसमोर हजेरी लावली. पहिले दोन तास तर संपादकांनी त्याला भेट दिली नाही. खूप गयावया केल्यानंतर संपादक त्याला भेटले. यावेळी संपादकांनी त्याची चांगलीच झाडाझडती घेत तासभर खरडपट्टी काढली. यावेळी त्याने रजेचे खोटे कारण सांगून सहलीला गेल्याची कबुली दिली असून, आपण स्व:खर्चाने सहल केल्याचे सांगितले. मात्र संपादकांना त्याचा खोटारडापणा लक्षात आल्याने ते काम थांबविण्याच्या भूमिकेवर ठाम होते. या प्रकरणी सदर बातमीदारावर कडक कारवाई  होण्याची चिन्हे आहेत
 * 'मानबिंदू'ने आपल्या जिल्हा-प्रतिनिधी आणि तालुका वार्ताहाराची अध्याप चौकशी सुरू केल्याचे समजले नाही. 'मानबिंदू'चा जिल्हा प्रतिनिधी तर काल एका पत्र परिषदेत 'मी नाही त्यातली..' असा आव आणून वागत होता. मी मुंबईत पद्मश्रीच्या पेपरमध्ये असताना खूप कमाई केली आहे, माझे मुंबईत 2 फ्लॅट आहेत, मला नोकरीची गरज नाही, असे काही पत्रकारांजवळ बोलत असल्याचे समजते.
* भोपाळशेठच्या 'भव्य मराठी'चा पत्रकार आज दिवसभर कार्यालयात ठाण मांडून होता. तोही बायको पोलीस खात्यात नोकरीला असल्याने 'भव्य'च्या नोकरीची गरज नसल्याच्या तोर्यात वागत आहे. तर 'पुण्य'चा जिल्हाप्रतिनिधी काल रुजू होणार होता मात्र बेरक्यावर बातमी झळकताच आणखी काही दिवसाची रजा वाढवून गायब झाला आहे.
*मानबिंदू, भव्यमराठी व पुण्यच्या या पत्रकारांवर काय कारवाई होते, याकडे जालन्याच्या मीडियाचे लक्ष लागले आहे. बेरक्याने या पत्रकारांचा पर्दाफाश केल्याने त्यांच्या हूकूमशाहीला कंटाळून गेलेले कनिष्ट सहकारी कर्मचारी मात्र खूष असून त्यांच्यापासून कधी कायमची सुटका होईल, याची वाट पाहत आहेत.