'पुढारी'पेक्षा 'गांवकरी' भारी !

औरंगाबाद - कोल्हापूरच्या पद्मश्रीचा पुढारी औरंगाबादेत सुरू होणार म्हणून गेल्या दहा वर्षापासून चर्चा सुरू आहे.दोन वेळा प्रयोग फसल्यानंतर तिस-यांदा पुढारीची नव्याने जुळवाजुळव सुरू आहे.२५ मार्च रोजी पुढारीमध्ये संपादकीय विभाग भरतीकरिता जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर पुढारी जून महिन्यात सुरू होणार,अशी चर्चा होती.परंतु योग्य आणि लायक माणसे पुढारीला न मिळाल्यामुळे जुनीच जाहिरात आज दि.१ जून रोजी दैनिक दिव्य मराठीमध्ये नव्याने प्रकाशित करण्यात आलेली आहे.दिव्य मराठीच्या जाहिरातीनंतर तरी पुढारीला माणसे भेटणार का ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीय आहे.पुढारी १७ सप्टेबर म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनादिवशी सुरू होणार असल्याची चर्चा आता नव्याने सुरू आहे.पुढारी औरंगाबादेत खरच सुरू होणार का ? या प्रश्नाचे उत्तर आता प्रत्यक्ष ब्रम्हदेवच देवू शकतो.
दुसरीकडे पुढारीपेक्षा गांवकरी भारी ठरला आहे.पोतनीसाचा गांवकरी आता आदर्श - अप्रतिम - गांवकरी  झाला आहे.त्यात आदर्शचे अंबादास मानकापे - पाटील,अप्रतिमचे डॉ.अनिल फळे आणि गांवकरीचे वंदन पोतनीस यांची भागिदारी राहणार आहे.गांवकरी आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात येत्या ८ जूनपासून सुरू होणार आहे.डॉ.अनिल फळे यांच्यामुळे गांवकरीला अप्रतिम टीम मिळाली आहे.केवळ फळे यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांचे अनेक जुने सहकारी गांवकरीमध्ये जॉईन झाले आहेत.फळे यांना टीम मिळू शकते,परंतु पुढारीच्या पद्मश्रींना टीम मिळू शकत नाही,हे कश्याचे द्योतक आहे.पद्मश्रीवरील विश्वास संपल्यामुळे की युनिट हेड कल्याण पांडे आणि चिफ रिपोर्टर अभय निकाळजे यांच्यावर असलेली नाराजी,यामुळे पुढारीला टीम मिळत नाही,याचे उत्तर शोधावे लागेल.
कल्याण पांडेंनी संपादकीय विभागात ढवळाढवळ करून,अनेक ठिकाणी पेशवाई सुरू केली आहे.काही दिवसांपुर्वी कल्याण पांडे आणि परभणीचा जिल्हा प्रतिनिधी दिलीप माने यांच्यातील व्हॉटस् गु्रपवर खंडाजंगी झाली.त्याची थेट तक्रार पद्मश्रीपर्यंत गेली आहे.पांडेची पेशवाई सुरू राहिल्यास पुढारीचे अधिकच 'कल्याण' होणार आहे.


दैनिक गांवकरी
नव्या रंगात,नव्या ढंगात !
औरंगाबाद - गेल्या चार वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळाची मालिका सुरू आहे.यंदा तर अभूतपुर्व दुष्काळ पडला होता. या दुष्काळाला धैर्याने तोंड देणा-या बळीराजाला सलाम !
यंदा भरपूर पाऊस पडेल,असा अंदाज व्यक्त केला जातोय.मृग नक्षत्र ७ जून रोजी निघत आहे आणि याच दिवशी दैनिक गांवकरी हा नव्या रंगात आणि नव्या ढंगात सुरू होत आहे.
 पाचशे रूपयात सहा महिने अंक ही स्कीम सुरू करण्यात आली आहे.पाचशे रूपयात दोनशे रूपयाची एक छत्री गिफ्ट मिळणार असून,तीनशे रूपयाची जाहिरात फ्रि मिळणार आहे.हा स्कीममुळे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात जवळपास ५० हजार वर्गणीदार झाले आहेत.संपुर्ण मराठवाड्यात ५० हजार अंकाची बुकींग झाली आहे.त्यामुळे रिलॉचिंगमध्ये दैनिक गांवकरीने १ लाखाचा टप्पा गाठला आहे.सिटीचा अंक १६ तर ग्रामीण भागात १२ पानी अंक राहणार आहे.अंकाची रोजची किंमत ३ रूपये राहणार आहे.
औरंगाबादच्या प्रिंटींग युनिटचे अत्याधुनिकरण करण्यात आले आहे.त्याचबरोबर प्रिंटीगचा कागद फॉरेन न्यूजपेपर राहणार आहे.आकर्षक लेआऊट,आकर्षक प्रिंटीग तसेच आगळ्या- वेगळ्या बातम्यामुळे दैनिक गांवकरी मानाचे स्थान पटकावेल,असा अंदाज आहे.
औरंगाबाबादेत दि.५ जून रोजी प्रचंड जलदिंडीचे आयोजनक करण्यात आले आहे.या जलदिंडीत मराठवाड्यातून अनेकजण सहभागी होणार आहे.दैनिक गांवकरीच्या रिलॉचिंगला आमच्या शुभेच्छा !