सोलापूर पुण्यनगरीत गळती सुरूच

सोलापूर - पुण्यनगरीच्या सोलापूर आवृत्तीत व्यवस्थापकांचा हुकूमशाही कारभार सुरू आहे.वृत्तसंपादकांपेक्षा व्यवस्थापक वरचढ ठरला असून संपादकीय कामात त्यांची ढवळाढवळ सुरू आहे.त्यामुळे गेल्या वर्षभरापासून किमान सात ते आठ उपसंपादक पुण्यनगरी सोडून गेले आहेत.
वृत्तसंपादक रघुवीर मदने असताना त्यांचे व्यव्स्थापक महाशय काहीच चालू देत नाहीत.ग्रामीण वार्ताहर नेमणुकीपासून सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले आहेत.त्यामुळे बातमी न लिहिणारे पण जाहिरात देणारे वार्ताहर व्यवस्थापकांना प्रिय झाले आहेत.जे वार्ताहर जाहिरात देत नाहीत किंवा टार्गेट पुर्ण करत नाहीत त्यांना घरी पाठवले जाते.
तसेच कोणती बातमी घ्यायची आणि कोणती बातमी टाळायची हे वृत्तसंपादकांच्या हाती राहिलेले नाही.सर्व काही व्यवस्थापक महाशयच पहात आहेत.उपसंपादकांवर ते अरेरावी करत असल्याने गेल्या एकवर्षभरात सात ते आठ उपसंपादक सोडून गेले आहेत.व्यवस्थापकांच्या मनमानीपणामुळे उपसंपादकांना काम करणे अवघड झाले आहे.मालकही व्यव्स्थापकांच्या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याने पुण्यनगरीची वाटचाल थंडावली आहे.