डोंगरधारीचे अधिकार गोठवले

मुंबई -सानपाड्यात बसलेल्या डोंगरधारीचे अधिकार गोठवण्यात आले असून पुढारीची ठाणे आवृत्ती स्वतंत्र करण्यात आली आहे.ठाणे आवृत्तीची एकूण 16 पाने असून पैकी आठ पाने ही ठाण्यात लावण्यात येत आहेत.बाकीची पाने ही कोल्हापूरहून येत असून ठाणे आवृत्तीशी डोंगरधारीचा कसलाही संबंध नाही.
पुर्वी ठाणेसाठी माय ठाणे ही चार पानी पुरवणी दिली जात होती .त्यावर सानपाड्यातून नियंत्रण केले जात होते आणि ठाण्यात कोणाला नेमायचे याचे अधिकार डोंगरधारीला होते,परंतु विजय बाबर येताच त्यांच्यावर संक्रांत कोसळली आहे.डोंगरधारीला अंधारात ठेवत मालकांनी ठाणे आवृत्ती स्वतंत्र केली आहे.ठाणे आवृत्तीचे सर्वाधिकार विजय बाबर यांना देण्यात आले आहेत.भविष्यात वसई - विरार ही स्वतंत्र आवृत्ती निघणार असून त्याचे अधिकार कोणाकडे राहणार याकडे लक्ष वेधले आहे.