लढा अजुन संपलेला नाही, संघर्षाचा सूर्योदय अजुन बाकी आहे.
अखेर तो दिवस आज उजाड़ला ज्या दिवसाची प्रतीक्षा राज्यातील तमाम पत्रकार
बांधव करत होते. तो अमरावती जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त पत्रकार प्रशांत
कांबळे अखेर आज बंदिस्त पिंजऱ्यातुन बाहेर तर पडला, पण राज्यातील
पत्रकारांनी उभारलेल्या संघर्षाला आणि प्रशांत व प्रशांत सारख्या असंख्य
बळी पडलेल्या पत्रकारांना संपूर्ण न्याय अजुन मिळालेला आहे असे म्हणता
येणार नाही तर न्याय व हक्काचा हा संघर्षशील लढा इथुन पुढे आपल्या सर्व
पत्रकारांना ज्वलंत ठेवावा लागणार आहे.
गेले
कित्येक दिवस झाले प्रशांत कांबळे संदर्भात राज्यातील कानाकोपऱ्यातील
पत्रकारांनी पोलिसी अत्याचारा विरोधात निषेध नोंदवून, निवेदने देऊन,
आंदोलने करुन, प्रशांतला न्याय देण्याकरिता प्रयत्न केले. सोशल मीडियावर
सुद्धा प्रशांतचा आवाज बुलंद करण्याकरिता रान उठवले आणि आज ती प्रतीक्षा
अखेर संपली मात्र प्रशांत बाहेर तर पडला पण ही लढाई अजुन संपली का? तर नाही
मित्रांनो, कारण आपल्या खऱ्या लढाईला आता कुठे सुरुवात झाली आहे. प्रशांत
बाहेर येणे हा आमचा शेवट नाही तर प्रशांत सारख्या असंख्य पत्रकारांवर अशी
वेळ पुन्हा कधीही येणार नाही अशी परिस्तिथी आम्हाला येत्या काळात निर्माण
करावी लागेल.
प्रशांत
संदर्भात जे जे काही खोटे आरोप झाले, गुन्हे दाखल करण्यात आले त्याबाबत
संबंधित पोलिस प्रशासनाला आज ना उद्या जाब द्यावाच लागणार आहे. याकरिता या
पुढील न्यायालयीन लढा आपल्याला शेवट पर्यन्त लढावाच लागेल. एक दिवस नक्कीच
सत्याचा विजय होईल. प्रशांतच्या मागे राज्यातील सर्व पत्रकार एकत्र आले.
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या पत्रकारांनी या लढ़यात आपला सहभाग नोंदवून
प्रशांतला पाठिंबा दिला त्या सर्व पत्रकारांच्या एकीला खरच दाद द्यावी
लागेल. इथुन पुढे प्रशांत सारखे अनेक पत्रकार जर अत्याचाराला बळी पडून
शिकार होताना दिसत असतील तर पुन्हा एकदा पेटून उठून ज्वालामुखी सारखा
ज्वलंत लढा आपल्या सर्वाना उभा करावा लागेल, कुणाचीही वाट न बघता.
अत्याचाराचा अंधार कितीही दाट असला तरी संघटित होवून लढलेल्या संघर्षाचा
सूर्योदय हा कुणी ही रोखू शकत नाही.
रात्र घनदाट आहे
पण इतकीही नाही
की ती उद्याचा
सूर्योदय रोखु शकेल,
संघटित व्हा 🤝आणि संघर्ष करा
🏻
राज्यातील पत्रकार एकजुटिचा विजय असो.
🏻
राहुल पहुरकर.
पत्रकार, मुंबई.
9987855550