![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_xkSjI_I9LRMndyDdsjcH4HOqx5LegUfosbZOLTBz0diDE3DogwGhCFvhlYsi7eGvhZoC8N2JClfNSwWBiiZJ_DW1MzLWhl4ammVSetwgzl-XeblUoZqEKzqgtqbHTGAObnSw_RsrQTE/s200/images.jpg)
आजपर्यंत
ABC (ऑडिट सर्क्युलेशन ब्युरो) ची आकडेवारी हीच वृत्तपत्राच्या खपाची खरी
आकडेवारी समजली जात होती, मात्र लोकमतने हंसा या खासगी संस्थेमार्फत
सर्व्हे करून, आपणच नंबर असल्याचा दावा वारंवार केलेला आहे.
ABC च्या आकडेवारीनुसार सकाळ महाराष्ट्रात नंबर 1 आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.
फ्री अंक, 3 रुपयांपेक्षा कमी किंमत आणि स्कीमचे अंक ABC ग्राह्य धरत नाही, त्यामुळे लोकमत मागे पडला, ही वस्तुस्थिती आहे.
आता
नुकतीच आयआरएस ( इंडियन रीडरशिप सर्व्हे ) ची आकडेवारी जाहीर करण्यात आली
आहे, त्यात वाचकसंख्या महाराष्ट्रात नंबर 1 -लोकमत , क्रमांक २ - सकाळ तर क्रमांक - 3 पुण्यनगरी अशी संख्या दाखवण्यात आली आहे, पण यात मोठी गेम आहे.
ही आकडेवारी नेमकी कशी मोजण्यात आली, हे एक कोडेच आहे.
असो, बेरक्याने केलेल्या सर्व्हेनुसार कोणत्या शहरात नेमके नंबर 1 कोण ? ते पाहा ...
> मुंबई - महाराष्ट्र टाइम्स
> पुणे - सकाळ
(सकाळच्या निम्म्या खपात बाकी सर्व वृत्तपत्रे)
> कोल्हापूर - पुढारी
- > नागपूर , औरंगाबाद , नाशिक आणि जळगाव - लोकमत
# एकंदरीत खपात लोकमत आणि सकाळमध्ये मोठी स्पर्धा ...
# पुण्यनगरी क्रमांक 3 वर
डिजिटल मीडियाचे वारे
कागदाचे वाढलेले भाव, कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या पगारी आणि इतर खर्च प्रचंड वाढलेला आहे. त्यात नोटाबंदी पासून जाहिरातीचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे सर्व वृत्तपत्रे सध्या तोट्यात सुरु आहेत. त्यात वाचक हार्डकॉपीपेक्षा ईपेपरकडे वळला आहे. त्यामुळे वृत्तपत्र चालवणे सध्या अवघड झाले आहे.
सध्या डिजिटल मीडियाचे वारे जोरात वाहत आहे. वाचक सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. वेब पोर्टल, युट्युब चॅनल वाढले आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांचे भविष्य अवघड झाले आहे. त्यात खपाची आकडेवारी टिकवून ठेवणे अवघड आहे.