वृत्तपत्र व्यवसाय संकटात


वृत्तपत्र प्रिंट करण्यासाठी लागणारा कागद  चीनमधून येत होता, पण चीनमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी वृत्तपत्र कागद  उत्पादन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे 90 टक्के कारखाने बंद झाल्याचे सांगण्यात येतंय.

दुसरीकडे भारतात गुजरातमधील एखादा दुसरा कारखाना सोडला तर वृत्तपत्र  प्रिंट करण्यासाठी लागणारा कागद मिळत नाही.इतर देशातील कागद परवडत नाही. 

एकंदरीत परिस्थिती पाहिली असता, कागद टंचाई निर्माण झाली असून, कागदाचे भाव दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा वृत्तपत्र संकटात सापडली आहेत.

मोठ्या वृत्तपत्रानी देखील दररोजच्या पानांची संख्या कमी केली आहे, तसेच पुरवण्या बंद करत आहेत.


येणारा काळ हा प्रिंट मीडियासाठी अत्यंत कठीण आहे.येणारे उत्पादन आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे अनेकांनी डिजिटल मीडियात लक्ष घातले आहे.

वृत्तपत्रांच्या दादागिरीमुळे पत्रकारांचा ऑनलाइन मिडियाकडे कल वाढला

वृत्तपत्रांच्या दादागिरीमुळे ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांनी आता आपला रोख ऑनलाइन मिडियाकडे केला आहे. वृत्तपत्रांमधील घटते उत्पन्न भरून काढण्यासाठी अनेक वृत्तपत्रांनी जाहिराती मिळविण्यासाठी ग्रामीण पत्रकारांना अक्षरशा भंडावून सोडले आहे. काहीही करा पण जाहिराती द्या, जाहिराती दिल्या आता त्यांचे पेमेंट भरा, पेमेंट नाही भरले तर न्यायालयीन कारवाईला तयार रहा असा दमच सध्या वृत्तपत्रांच्या ऑफिसमधून  पत्रकारांना दिला जात आहे.
वृत्तपत्रांच्या अश्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेक पत्रकारांनी सध्या ऑनलाईन मीडियाचा पर्याय स्वीकारला आहे. जाहिरातींची कट कट नाही. पाठवलेली बातमी अर्ध्यातासाच्या आत लाईव्ह होते, त्यामुळे आज घडलेली घटना आजच पाहायला मिळत असल्याने वाचकवर्गही ऑनलाइन मिडियालाच पसंती देताना दिसत आहे.

कॉस्ट कटिंग सुरु
  1. दिव्य मराठीने महाराष्ट्रातील विस्तार थांबवला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग केली आहे. तसेच काही ब्युरो ऑफिस बंद करणार असल्याचे वृत्त आहे. 
  2.  पुढारीही येत्या काही दिवसात कॉस्ट कटिंग होणार असल्याचे समजते..
  3.  अनेक जिल्हा वृत्तपत्र बंद
  4.