मुख्यमंत्र्यानी एबीपी माझाचे कान टोचले !

उघडा डोळे, बघा नीट म्हणणाऱ्या एबीपी माझाने सावरकर जयंती दिवशीच 'सावरकर नायक की खलनायक' या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम घेतल्यामुळे माझाला ट्रोलिंग व्हावे लागले होते.

त्याची धग अजूनही संपलेली नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही,सावरकर प्रकरणी माझाचे कान त्यांच्यात कार्यक्रमात टोचले. माझाच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यात अगदी शांतपणे, अजिबात चिडचिड न करता मुख्यमंत्री फडणवीस यांनी, संपादक राजीव खांडेकर आणि माझाच्या टीमला कानपिचक्या दिल्या ..

पाहा, काय म्हणाले मुख्यमंत्री...