लोकशाहीत 'लोक'शाही संपली? मालक आणि कर्मचारी यांच्यात 'खटके'!

मुंबई  - अरेच्चा! लोकशाही मराठी वाहिनीत गोंधळाची 'ब्रेकिंग न्यूज'! टीआरपी नसल्याने मालक गणेश नायडू आणि विशाल पाटील यांच्यात जोरदार खटके उडत आहेत. काही कर्मचारी तर 'लोक'शाही सोडून 'जन'शाहीत जाण्याच्या तयारीत आहेत.

आमच्या गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र अक्कलदेवी (बिझनेस हेड) यांनी राजीनामा धरला आहे. पण मालकांनी तो अजून स्वीकारलेला नाहीये. कदाचित त्यांना वाटत असेल की जितेंद्र गेल्यावर 'लोक'शाही 'शून्य'शाही होईल!

तर दुसरीकडे, प्रसाद काथे हे संपादकपदाच्या शर्यतीत आहेत तर चॅनलमधीलच लाघवीला संपादकपदाची स्वप्न पडू लागली आहेत.  पण प्रश्न असा आहे की, ज्या वाहिनीला दिशाच नाहीये, तिथे ते संपादक झाले तर काय उपयोग? रिपोर्टर्स पाच, पण गाड्या फक्त दोन! अशा परिस्थितीत रिपोर्टर्सना धावत धावत बातम्या द्याव्या लागतील का?

आउटपुटमध्येही गोंधळ सुरू आहे. ग्राफिक्स आणि हेडलाईन्स चुकीच्या पद्धतीने जाताहेत. त्यामुळे मालक वैतागले आहेत. कमलेश सुतार यांच्यानंतर वाहिनीला चेहराच मिळालेला नाहीये. विशाल पाटील यांचा चेहरा... बरं सोडा!

जुन्या कर्मचाऱ्यांना पगार कमी, तर विशाल पाटील ज्यांना घेऊन येतात त्यांना पगार जास्त! अरेच्चा, ही तर 'विशाल'शाही झाली! 'लोक'शाहीत 'विशाल'शाही चालू असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

एकंदरीत, लोकशाहीत 'लोक'शाही संपली आहे की काय असा प्रश्न पडला आहे. आता पाहूया पुढे काय होते ते! मालक आणि कर्मचारी यांच्यातील 'खटके' कसे मिटतात आणि 'लोक'शाही पुन्हा 'ब्रेकिंग न्यूज' कशी बनते ते!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या