मुंबई: नुकत्याच दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात स्ट्रिंगर पॅनेल निवडीसाठी मुलाखती पार पडल्या
पण या सगळ्या प्रक्रियेनंतर आता एक मूलभूत प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत आहे: इतका मोठा व्याप आणि खर्चिक प्रक्रिया करून खरोखरच नव्या चेहऱ्यांना संधी मिळते का? की हा निव्वळ एक वार्षिक सोपस्कार आहे?
तेच चेहरे, त्याच नेमणुका... मग फार्स कशासाठी?
अनेक वर्षांपासून या मुलाखती प्रक्रियेवर एक दबक्या आवाजात चर्चा नेहमीच सुरू असते. ती म्हणजे – मुलाखत देणारे अनेक चेहरे वर्षानुवर्षे तेच असतात आणि बऱ्याचदा नियुक्तीही त्यांचीच होते. जर हे खरं असेल, तर मग प्रश्न पडतो की:
- ही किचकट निवड प्रक्रिया – ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, कॉर्पोरेट स्थिती, वाहतूक व्यवस्थेचा तपशील
अशा अनेक बाबींची पडताळणी केली जाते – केवळ कागदोपत्री खेळ आहे का? - शॉर्टलिस्टेड उमेदवारांना दूरदर्शन केंद्र, वरळी
येथे बोलावून, त्यांची साधनसामुग्री तपासून, जागेवरच कव्हरेज करून घेण्याचा खटाटोप नेमका कुणासाठी? - जर पॅनेलमध्ये ठराविक नावांनाच प्राधान्य मिळणार असेल, तर नवीन आणि होतकरू उमेदवारांनी या प्रक्रियेकडे आशेने का पाहावे?
हा केवळ एका वर्षीचा प्रश्न नाही, तर दरवर्षी उपस्थित होणारा सवाल आहे. दूरदर्शनसारख्या प्रतिष्ठित आणि सार्वजनिक प्रसारण संस्थेकडून अधिक पारदर्शकता आणि समान संधीची अपेक्षा करणे गैर नाही. या मुलाखती आणि निवड प्रक्रिया खरोखरच गुणवत्तेला आणि ताज्या प्रतिभेला वाव देणारी असावी, केवळ एक वार्षिक 'इव्हेंट' नसावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, "मुलाखतीचा फार्स कशासाठी?" हा प्रश्न अधिक जोरकसपणे विचारला जाईल, हे नक्की.
0 टिप्पण्या