त्रिकुटामुळेच अरूण खोरेंचा राजीनामा

पुणे - पद्मश्रींच्या पुणे कार्यालयात गेल्या महिनाभरात एकाहून एक मोठे फटाके उडत आहेत.  त्यामुळे वरपासून खालपर्यंत अत्यंत अस्वस्थता आणि गढूळ वातावरण आहे. पुढारीतील कामकाजाला आणि नंदू,- संजू-अंजू या त्रिकुटाच्या राजकारणाला वैतागून संपादक अरुण खोरेंनी अखेर रामराम ठोकला.  नेहमीप्रमाणे कोणत्याही नव्या माणसाला टिकू न देता आपले स्थान बळकट करण्याच्या नंदू , संजू आणि अंजू मॅडमच्या कारस्थानांनी खोरे कमालीचे त्रस्त झाले होते. त्यामुळे सकाळ, लोकसत्ता,लोकमत अशा परंपरेतून आलेल्या आणि श्रेष्ठ संपादकांसमवेत काम केलेल्या खोरेंनी  अखेर राजीनामा दिला. दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने संजय आवटे यांना पायउतार व्हावे लागले होते.अत्यंत अभ्यासू व दर्जेदार लिखाण करणारे संजय आवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर पद्मश्रींनी नंदु आणि संजुला चांगलेच फैलावर घेतले होते.

.पुणे कार्यालयातील या नेहमीच्या प्रकारांनी पद्मश्री आणि विशेषत: योगेशदादा कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. 

Post a Comment

0 Comments