वाचक काय म्हणतात...

राजमान्य राजश्री डोंगरकीपर यांनी अखेर आपल्या आरोपांवरील उत्तर देण्यासाठी तोंड उघडले. पण त्यांचा हा खुलासा म्हणजे 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली' अशा पद्धतीचा आहे. मुंबईत एका संपादकाला कारमध्ये रासक्रीडा करताना पोलिसांनी पकडले होते? तो संपादक कोण, हे तमाम पत्रकारांना माहीत आहे. तसेच केबिनमध्ये महिला पत्रकारांना पत्रकारीताबाह्य उपक्रमांसाठी दोन-दोन तास घेऊन बसणारा संपादक कोण, हेही मुंबईतील मिडीयाला चांगलेच ठाऊक आहे. तेव्हा डोंगरकीपर आता आपली उरलीसुरली लाज वाचवण्याचा केविलवाणा खटाटोप करत आहेत.  डोंगरकीपर यांचे चारित्र्य कसेही असो, ते आक्रमक व शैलीदार पत्रकार म्हणून ओळखले जातात. मात्र खुलासे करताना त्यांनी त्यांच्या कथित शत्रूंची टोपणनावे (चांदोबा, लष्कर-ए-होयबा इ) वापारली. त्यांनी खरी नावे का उघड केली नाहीत. कर नाही त्याला दर कशाला? पण चारित्र्य गमावलेल्या माणसाकडून सत्याची अपेक्षा काय करणार? हा बाबा आता मला काढले नाही, तर मीच चांगल्या संधीसाठी नोकरी सोडली असं  म्हणतोय! आता याला काय म्हणावे?
 - ना. मा. निराळे