गावकरीच्या रावांचे दुर्लक्ष

औरंगाबाद -गेल्या तीन  महिन्यांपासून पगार होत नसल्याने दैनिक गावकरीचे  कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत - वंदनराव पोतनीस यांनी  दुर्लक्ष केल्यामुळे  औरंगाबाद युनिट शेवटची घटका मोजत आहे. दोन दिवसात पगार न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा  आणि बेमुदत उपोषण करणार असल्याचा FAX  कर्मचार्यांनी पोतनीस यांना केला आहे.
गावकरीचे मालक पोतनीस यांनी ठोस भूमिका न घेतल्यास कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्याचाही निर्णय कर्मचार्यांनी घेतला आहे.