पत्रकारितेत 'गाढव' कोण ?

आय.बी.एन.- लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दोन वर्षापुर्वी बीड जिल्हा पत्रकार संघाने पुरस्कार देवून गौरव केला होता.त्यानंतर काही दिवसांनी लोकसत्तात एका वाचकांने वागळेंना पुरस्कार कशासाठी दिला म्हणून पत्र लिहिले होते. लोकसत्ताने हे पत्र प्रसिध्द केल्यानंतर वागळे लोकसत्ताचे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर यांच्यावर नाराज होते.
नंतर पुण्यात एका मुलाखतीच्या कार्यक्रमात वागळेंनी गिरीश कुबेर गाढव असल्याचा जावाईशोध लावला होता. वागळेंनी गाढवाची उपमा दिल्यानंतर गिरीश कुबेर व वागळे यांच्यात शितयुध्द सुरू झाले.
नंतर कुबेरांनी ठरवले की, लोकसत्तात वागळेची कोणतीच बातमी अथवा नाव द्यायचे नाही,आणि वागळेंनी ठरवले की, कुबेरांना आय.बी.एन.लोकमतवर चर्चासत्रासाठी बोलवायचे नाही.
परवा विधीमंडळात निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला.त्याची लोकसत्तात केवळ दोन ओळीची बातमी प्रसिध्द झाली. त्यात केवळ खांडेकरांचे नाव होते, वागळेंचे नव्हते. कुबेरांनी आपला शब्द येथेही खरा केला.
ऐवढेच नाही तर कुबेरांनी टयुटरवर टयुट केले आहे की, पत्रकारांनी राज्यकत्र्याविरूध्द बोलताना भान ठेवले पाहिजे. तो वागळेंना अप्रत्यक्ष जोडा होता.
गंमत अशी की, यासंदर्भात ABP माझावर जे चर्चासत्र झाले, त्यात गिरीश कुबेरही होते. कुबेरांनी यावेळी हक्कभंगाचा विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते,तसेच आमदाराविरूध्द प्रखर टीका केली होती.
मात्र कुबेरावर विधीमंडळात हक्कभंग दाखल झाला नाही. कुबेरांनी राज्यकत्र्यांविरूध्द मवाळ धोरण वापरल्याने व गुप्त वाटाघाटी केल्याने त्यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला नसल्याची चर्चा आहे.
मग पत्रकारितेत गाढव कोण, हे तुम्हीच ठरवा.
...................................................
निखिल वागळे हे माणुसघाणे आहेत, त्यांचे स्वत:च्या पत्नी आणि मुलाबरोबर पटत नाही तर कर्मचा-याबरोबर कसे पटणार.एक मुलाखातकार म्हणून वागळेंना तोड नाही, कोणालाही अंगावर घेण्याची त्यांची धमक आहे. मात्र कधी कधी ते वाहत जातात.राजदीप सरदेसाई यांच्या वरदहस्तामुळे केवळ वागळे आय.बी.एन.लोकमतमध्ये टिकून आहेत.मात्र हा माणूस चॅनलपेक्षा स्वत: मोठा झाला आहे. चॅनलला चेहरा लागतो, म्हणून राजदीप सरदेसाई वागळेंचे अवगुण माफ करतात, मात्र चांगल्या गुणापेक्षा अवगुण जास्त असल्याने वागळेंवर टीका जास्त होते.
वागळे हे घमेंडखोर आहेत, त्यांना लोकांची किंमत वाटत नाही.लोक त्यांंना भेटायला येतात, पण ते भेटत नाहीत.
वागळे तुमच्या गुणावर आणि मतावर तुम्ही ठाम रहा, लोक तुमच्यावर असेच टीका करणार....
 
 निरगुडकरांनी शेपूट घातले
एकीकडे वागळे आणि खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंग दाखल झाल्याच्या बातम्या गाजत असताना, झी २४ तासचे उदय निरगुडकर आपल्या चॅनलवर वेगळीच बातमी चालवित होते.
म्हणे उदय निरगुडकर यांचे आमदारांनी अभिनंदन केले, झी २४ तासचीच खरी पत्रकारिता.
वारे वा निरगुडकर, शेपूट घातले म्हणजे खरी पत्रकारिता नव्हे.