बीड जिल्ह्यात वार्ताहरावर प्राणघातक हल्ला

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर बुधवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आहे.

या हल्ल्यात अरविंद वाव्हळे हे गंभीर झाले जखमी आहेत. ते झुंजार नेता या वृत्तपत्राचे वार्ताहर आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात बातम्या दिल्या म्हणून माजी सरपंचाने हा केल्याची माहिती हाती आली आहे.

 हल्लेखोरास तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.या हल्लाचा सर्व पत्रकाराच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे.


‘बेरक्या’ या संपूर्ण प्रकरणाने कमालीचा व्यथित आहे. कारण ‘बेरक्या’ हा पत्रकारांचा पाठिराखा आहे; त्यांच्या सुख-दु:खातील साथीदार आहे. कोणत्याही पत्रकारावरील हल्ला, आघात ‘बेरक्या’ला अस्वस्थ करतात. हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे.
पत्रकारांवर जे हल्ले वाढले आहेत,त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत. आपणच आपल्या लोकांचे पाय खेचतो...आपल्यांत एकी नाही.हा अमक्या पेपरचा,अमक्या गटाचा पत्रकार...आपल्याला काही घेणे - देणे नाही,असे वागतो...कोणत्याही गावांत,शहरात,तालुक्यात,जिल्ह्यात किंवा महानगरमध्ये जा,तिथे पत्रकारांमध्ये अनेक गट आणि तट दिसतील.अरे, अश्या प्रकरणात तरी एक व्हा...हल्ल्याची बातमी किती वृत्तपत्र आणि चॅनल देतात ? हा अमक्या पेपरचा वार्ताहर आहे, हल्ला करणारा आपल्या गटाचा आहे, जाहिराती बुडतील म्हणून विचार करतात...त्याचा आज परिपाक आहे.
पुर्वी पत्रकारांना किती आदर होता,आता पत्रकार आहे,म्हणायला लाच वाटते,काय घडतय असे....कोण याचे आत्मपरिक्षण करतात आहे का ? चलता है,चलने दो..म्हणतात....

चला आता तरी एक होवू या...