इलेक्ट्रॉनिक मीडियाने गाठली हिन पातळी....

उत्तराखंडमध्ये महाप्रलय येवून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.त्यांना करण्यात येणारी मदत आणि उपाययोजना यावरून हिंदी आणि मराठी न्यूज चॅनलवर दररोज चर्चा चालू आहे.त्यात राजकारण्यांनी हिन पातळी गाठली आहे.
जशी राजकारण्यांनी हिन पातळी गाठली तशीच इलेक्ट्रॉनिक मीडियाने हिन पातळी गाठली आहे.चर्चा चालू असताना, आमचे रिपोर्टर सर्वात आधी पोहचले, सर्वात अगोदर दृश्ये टिपली,डोंगर,द-या ओलांडून रिपोर्टरचे महाकव्हरेज,सबसे तेज, सबसे पहले, आम्हीच कसे सरस आहोत, संपादकांना केलेला फोन कॉल,वगैरे दाखवून स्वत:ची किती लाल आहे,हे सांगत आहेत.
प्रिंट मीडिया असो कि इलेक्ट्रॉनिक मीडिया,बातम्या देणे,हे काम आहे.त्यात मार्केटींग केली जात आहे.ऊन,पाऊस,थंडी खराब हवामान याची तमा न बाळगता भारतीय सैनिक जीवाची पर्वा न करता काम करून, अनेकांचे प्राण वाचवत आहेत.त्यांना सलाम ठोका...
मात्र हे राजकारणी आणि मीडियावाले, मढ्याच्या टाळूवरील लोणी खात आहेत...त्याचा निषेध...