अखेर विश्व सह्याद्री बंद पडला

पुण्याहून तीन महिन्यापुर्वी निघालेला विश्व सह्याद्री अखेर बंद पडला आहे.त्यामुळे जवळपास 100 लोक बेकार झाले आहेत.विश्व सह्याद्रीचा व्हिजन वार्ता होणार,हे संकेत आम्हाला त्याचवेळी मिळाले होते,त्यामुळेच आम्ही लोकांना सावध केले होते.अखेर घडलेही तसेच.केवळ तीन महिन्यात हा पेपर बंद पडला आहे.
विश्वसह्याद्रीच्या मालकाने शुक्रवारी मिटींग घेवून सांगितले की,तीन महिन्यात माझे सव्वा दोन कोटी रूपये गेले आहेत,पुढे पैसे घालविण्याची माझी इच्छा नाही.मला माफ करा.मालकाचा निर्णय ऐकूण बिचारे कर्मचारी रडकुंडीला आले.त्यांना केवळ एकच महिन्याचा पगार मिळाला.दोन महिन्याचा पगार बुडाला.बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या,अशी त्यांची अवस्था झाली.
संजीव शाळगावकर या दैनिकाचे निवासी संपादक होते.अखेर शाळगावकरांची शाळा बंद पडली आहे.आता शाळगावकर भोकरेंच्या जनप्रवासमध्ये नव्याने प्रवास करणार आहेत.पुढारीतून हाकलून लावल्यानंतर,पुण्यनगरी,नंतर विश्व सह्याद्री आणि आता जनप्रवासमध्ये प्रवास सुरू होत आहे.केवळ मोठ्या गप्पा मारल्यानंतर पेपर चालत नसतो,हे शाळगावकरांना कोण समजावून सांगणार ?