दिव्यचा महाराष्ट्रातील विस्तार थांबवला

अकोला एडिशन सुरु झाल्यापासून पेटलेले राजकारण, राठोडांच्या जागी सक्षम संपादक मिळत नसल्याने दिव्यने नागपूर एडिशनचा मुहूर्त लांबणीवर टाकला आहे. दिव्यचे अकोला एडिशन फेल गेले आहे. चांगली टीम असूनही केवळ राजकारणा मुळे चांगल्या बातम्या येत नाही. त्यामुळे लोकांनी अंक बंद करणे सुरू केले आहे. बुलडाण्यातही पकड नाही, वाशीमातही धंदा नाही अशी स्थिति आहे.
 अमरावती एडिशनची  टीम मात्र जोरदार आहे. अकोल्याहून मिळणारी अपमानास्पद वागणूक, तेथील हस्तक्षेप सोडला तर अमरावतीचा खप आता 26 हजारावर गेला आहे. पण अकोल्यात पर्यायी लायक संपादक जोवर मिळत नाही तोवर नागपुरात जायचे नाही असा निर्णय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विस्ताराला ब्रेक देत भास्कर बिहार मध्ये प्रवेश करत आहे. पटणा येथे मुख्यालय असेल. त्याला लागून तीन एडिशन्स असतील. ही गडबड आटोपताच अकोल्यातील 'त्या' वादग्रस्त केबिन बाबत ठाम निर्णय घेऊ असा निरोप अभिलाष खांडेकरांनी आज सर्व असंतुष्टांना धाडला आहे. आपली निवड चुकली अशी प्रांजळ कबुली त्यांनी काहींशी मोबाईलवर बोलताना दिली. नागपूरला एडिशन सुरू करण्यापूर्वी चूक सुधारु. 'त्या' केबिन मधला व्यक्ती एडिशन सुरू होऊन चार महिन्यातच काढला, तर बाजारात चुकीचा संदेश जाईल म्हणून हा कठोर निर्णय थांबवल्याचा निरोप खांडेकरांचा आहे. पण तक्रारींची संख्या अशीच कायम राहिल्यास तातडिने अग्रवालजींशी बोलता यॆईल असेही त्यांच्या संदॆशात नमूद आहे. बेरक्यावर येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोचतात. अनेक वरिष्ठ हे अपडेट एसएमएस करतात. हे सर्व जाणूनच तातडीने अमरावतीसाठी नितीन फलटणकरला पाठवले. अकोल्यातही बदल केले, पण यानंतर दिव्य मधल्या अकोला एडिशन मधील एकानेही राजीनाम्याचा ई-मेल केला तर तातडिने निर्णय घ्यावाच लागेल कारण टीम महत्वाची असे खांडेकरांनी दोघांच्या आणि एसएमएस मधून स्पष्ट केले आहे.
.......................................

दिव्य अमरावतीमधून राजीनाम्याची नोटिस देणारे व्यवस्थापक धनंजय कानबाले यांचे मन वळवणे सुरू.... त्यांचा दुसरा सहकारी कानबालेंच्या निर्णयावर अवलंबून. नाराज असलेल्या एकाची लोकमतच्या वरिष्ठांसोबत चर्चा. संपूर्ण विषयाची माहिती खांडेकरांपर्यंत. बिहार मधील पटणाचे एडिशन सुरु झाल्यानंतर मोठा निर्णय घेण्याचे संकेत....