'आज तक'वर आली माफी मागण्याची पाळी !

इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टूरिजम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) ने न्यूज ब्रॉडकास्टर्स स्टैंडर्ड्स अथॉरिटी (एनबीएसए)कडे दाखल केलेल्या एका तक्रारीनंतर 'आज तक' वाहिनीवर माफी मागण्याची वेळ आली आहे. १३ ते १७ जानेवारी या कालावधीत ही जाहीर माफी मागितली गेली. ज्या व्यक्ती, संस्था, पक्षावर आरोप केले गेले आहेत, तिची बाजू न मांडता बदनामी केल्याबद्दल ; तथ्य जाणून न घेता, एकांगी वृत्त प्रसारित करण्याबद्दल 'एनबीएसए'ने 'आज तक'ला दोषी धरून हा निकाल जाहीर केला होता.

'आज तक'ने २४/०३/२०१३ रोजी 'दलाल जंक्शन' या शीर्षकांतर्गत "आयआरसीटीसीकी वेबसाईट पर गडबडझाला" हे वृत्त प्रसारित केले होते. त्यात 'आयआरसीटीसी'वर नाहक आरोप केल्याचे याचिकाकर्त्यानी पटवून दिले. 'टीव्ही टुडे'चे लीगल हेड पुनीत जैन व एडिटर दीपक शर्मा यांना हे आरोप योग्य असल्याचे सिद्ध करता आले नाही. त्यामुळे १३ ते १७ जानेवारी असे सलग पाच दिवस जाहीर माफीनामा प्रदर्शित करण्याची वेळ त्यांच्यावर आली. संबंधित बातमीचा व्हिडीओही 'आज तक'ला वेबसाइटवरून काढावा लागला. वाहिन्यांच्या मनमानी कारभाराला दिलेली ही एक सणसणीत चपराक मानली जात आहे.

(एनबीएसए)चा निकाल इथे पाहा.