औरंगाबाद शहरात दलबदलू लोकांची चलती

औरंगाबाद - औंरगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून चार दैनिकांत ऐकमेकांचे माणसे फोडण्याची स्पर्धा लागली आहे.त्यात एकाच वर्षात तीन दैनिके बदलणा-यांचा भाव चांगलाच वधारला आहे.काही जण मला तिकडीची ऑफर आहे,पगार वाढवून दिला तर राहतो अन्यथा तिकडे जातो म्हणून आपल्या दैनिकांच्या व्यवस्थापकांना ब्लॅकमेल करीत आहेत.अशा दलबदलू लोकांची औरंगाबादेत सध्या चलती सुरू आहे.

काही दिवसांपुर्वी लोकमतचे तिघेजण सकाळमध्ये गेले.त्यानंतर सीएनएक्स पुरवणीचा राहूल जगदाळे हा दिव्य मराठीच्या डी.बी.स्टारला गेला आहे.आता लोकमतमध्ये तीन ते चार जागा भरावयाच्या असून,सकाळचा एक माथाडी कामगार तसेच म.टा.चे दोघे लोकमतच्या वाटेवर आहेत.सकाळमध्ये देऊळ बांधणारा एकजण म.टा.मध्ये दुप्पट पगारावर गेला होता पण तिथे चांगलाच बदनाम झाल्यानंतर आता लोकमतच्या वाटेवर असून किमान पाच हजार वाढवून मागत आहे.म.टा.मधील आणखी एक शिवाजी लोकमतच्या वाटेवर आहे.अशा दलबदलू लोकांची सध्या चलती आली आहे.जे निष्ठेने काम करतात,त्याच्या हातात बाबाजी का ठुल्लू तर दल बदलणा-यांना एका वर्षात दुप्पट पगार मिळत आहे.
सकाळमध्ये पुर्वी चिफ रिपोर्टर असलेला एकजण व्यवस्थापनाला असाच ब्लॅकमेल करीत होता.लोकमतला संजीवनी देणारा एक कार्यकारी संपादक त्यास सतत गोंजारत होता.मात्र पगार आणि पदावरून त्याचे घोडे अडले होते.आता तो लोकमतमध्ये कोणत्याही पदावर येण्यास तयार असला तरी लोकमतमधील शांती भंग पावेल म्हणून त्यास एक लाल विरोध करीत आहे आणि त्याचा विजय व्हावा म्हणून दुसरा सदैव साथ देत आहे.पाहु या,या फोडाफोडीत कोण जिंकणार आणि कोण हारणार ?