लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांचा राजीनामा

औरंगाबाद -महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या.कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांचा अचानक राजीनामा घेण्यात आला.उन्हाळे यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांना काढून टाकण्यात आले,याबाबत चर्चेला ऊत आले आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स'चे प्रतिनिधी असलेले संजीव उन्हाळे हे दोन वर्षापुर्वी लोकमतमध्ये दाखल झाले होते.त्यांच्याकडून बाबूजींच्या फार अपेक्षा होत्या,मात्र त्या फेल गेल्या होत्या.त्यामुळे छोटे आणि मोठे बाबूजी उन्हाळेंवर नाराज होते.त्यांचा दोन वर्षाचा करार संपल्यानंतर,ते एक महिन्यापासून सुट्टीवर होते.मात्र एक वर्षाची त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.त्यानंतर दोनच दिवसांपुर्वी ते जॉईन झाले होते.तसे वृत्त बेरक्याने दिले होते.
मात्र शुक्रवारी अचानक काही घडामोडी घडल्या. सायंकाळी साडेसात वाजता संजीव उन्हाळे यांचा अचानक राजीनामा घेण्यात आला. काही निवडक रिपोर्टरच्या बैठकीत छोट्या बाबूजींनी उन्हाळेंचा राजीनामा घेण्यात आल्याची घोषणा केली आणि लोकमत भवनमध्ये मोठी खळबळ उडाली.
मावळते कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे अत्यंत हुशार आणि अभ्यासू पत्रकार आहेत.मात्र लोकमतचे व्यवस्थापन करण्यात त्यांना अपयश आले.त्यांनी ब्युरो कार्यालयात काही बदल केले होते,परंतु ते त्यांच्या अंगलट आले.स्थितप्रज्ञ असलेल्यांनी त्यांचे कान फुंकले आणि त्यांच्या ते अंगलट आले.ज्यांना त्यांनी चिफ रिपोर्टर केले तेही कुचकामी निघाले.त्यामुळे हॅलोचे बारा वाजले होते.आता उन्हाळे गेल्यामुळे ब्युरो कार्यालयात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.