तीन वर्षे पुर्ण झाली तरी चार जिल्ह्यात दिव्य दूरच

औरंगाबाद - दिव्य मराठीची पहिली आवृत्ती औरंगाबादहून तीन वर्षापुर्वी सुरू झाली.२९ मे रोजी दिव्य मराठीचा तिसरा वर्धापन दिन आहे.मात्र मराठवाड्यातील चार जिल्ह्यात अजूनही दिव्य मराठी पोहचला नाही.
नांदेड,परभणी,हिंगोली आणि लातूर अशी ही चार जिल्हे आहेत.उस्मानाबादला जो अंक जातो,तो सोलापूला छापला जातो.मुख्य बारा पानात ज्या जाहिराती असतात,त्या सोलापूरच्या असतात.उस्मानाबादच्या अंकावर सोलापूरची मोहर असते.
मराठवाडा छापचा अंक औरंगाबाद,जालना आणि बीड या तीनच जिल्ह्यात आहे.नगरचीही तीच बोंब आहे.नगर आवृत्ती औरंगाबादमध्ये छापली जाते.मात्र नगर जिल्ह्यात अजूनही अंक पोहचलेला नाही.सोलापूर आवृत्ती सोलापूर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत.त्यामुळे मराठवाड्यातील उर्वरित चार जिल्ह्यात दिव्यचा अंक सुरू होणे कठीण आहे.

दिव्यचे लाँचिग रखडले

औंरगाबाद आवृत्ती चार जिल्ह्यात अजूनही पोहचली नाही.त्यानंतर नाशिक,जळगाव,अकोला आणि सोलापूर या आवृत्त्या सुरू झालेल्या असल्या तरी पुढच्या सर्व आवृत्त्या रखडलेल्या आहेत.त्यामुळे दिव्यकडे डोळा लावून बसलेल्या पत्रकारांचे दिव्य स्वप्न भंग पावले आहे.

केतकर गेले,नवा भिडू कोण ?
दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांचा तीन वर्षाचा करार संपला आहे.त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे.त्यांच्या जागेवर अजूनही मुख्य संपादक म्हणून कोणाचीही निवड झालेली नाही.प्रशांत दीक्षित यांचे नाव आघाडीवर असले तरी भोपाळशेठने अजूनही ग्रीन सिग्नल दिलेला नाही.
केतकर दिव्य सोडणार,हे लक्षात आल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक समर खडस चार महिन्यापुर्वी लोकमतला गेले,आता लोकमत सोडून म.टा.ला जात आहेत.प्रसाद केरकर कृषीवलमध्ये स्थिर झाले आहेत.अजूनही काही केतकर समर्थक दिव्य सोडण्याच्या विचारात आहेत.

लांबे म.टा.च्या वाटेवर

 दिव्य मराठीचे औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक धनंजय लांबे यांचा तीन वर्षाचा करार येत्या ३१ मार्च रोजी संपत आहे.त्यांना मुदतवाढ द्यायला भोपाळशेठ तयार नाहीत.त्यामुळे लांबे म.टा.च्या वाटेवर आहेत.लांबेच्या जागेवर संजीव उन्हाळे यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.
दिव्य मराठीच्या निवासी संपादकांसाठी उदय भविष्यपत्राच्या एका माजी कार्यकारी संपादकांचे नाव आघाडीवर होते,मात्र त्यांना सकाळ सोडून दिव्य मध्ये गेलेल्या चार जणांनी कडाडून विरोध केला,ऐवढेच नाही तर दिव्य सोडून जाण्याची धमकी दिली.त्यामुळे त्या उदय भविष्यपत्राच्या माजी कार्यकारी संपादकांचा पत्ता कटला आणि उन्हाळे यांचे क्रमांक दोनवर असलेले नाव एकवर आले.अखेर उन्हाळे यांना दिव्य मराठीचा 'दिलासा' मिळाला ...