सांगलीत बोगस पत्रकारांचा सुळसुळाट


       सांगलीत सध्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे.जश्या
पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात, तसेच निवडणुक काळात बोगस पत्रकार पुन्हा
एकदा उगवले आहेत.बोगस टी व्ही पत्रकार हे मोठ्या प्रमाणत आहेतच,शिवाय कोणत्या
ही पेपरला काम न करणारे प्रिंट मीडियातील बोगस पत्रकारही सांगली जिल्ह्यात कार्यरथ
झाले आहेत.भानगडी  करणार्या  काही पत्रकाराना टी व्ही चैनेलने घरचा रस्ता दाखवला,
तर काहींचे टी व्ही चैनेल बंद पडले आहेत. मात्र  कोणत्याही  माध्यमात काम न करता
सुद्धा पत्रकार  बैठकीत  गुरगुरणार्या या बोगस टी व्ही आणि प्रिंट पत्रकारांचा त्रास वाढला
आहे.  एक तर सांगलीतील पत्रकारांची संख्या जास्त त्यात अर्धे  निम्मे बोगस पत्रकार
त्यामुळे  सांगलीत प्रेस घेणे हे काय ? गरीब किंवा सर्वसामान्य  नेत्याच्या आवाक्यात
राहिले  नाही. बोगस  पत्रकारांच्या  अनेक  कारनाम्या मुळे  नेते  आणि  अधिकाऱ्यांची
डोकेदुखी वाढली आहे.
           सांगलीच्या  पत्रकारितेचा मोठा इतिहास आहे. अनेक  दिग्गज  पत्रकारांनी येथे
चांगली पत्रकारिता केली आहे,आणि आजही अनेक जण चांगली पत्रकारिता करत आहेत.
मात्र सर्व क्षेत्रात बोगसगिरी शिरल्यावर,पत्रकारिता कशी अपवाद ठरणार…सध्या बोगस
पत्रकारांची सांगलीत चलती सुरु  झाली आहे. काम  कुठे  करतो  हे सांगत नाहीत, मात्र
समोरच्याचे  काम  तमाम  कसे करायाचे  हे मात्र  या महाठ्गाना चांगलेच माहित आहे.
          निवडणूक काळात 'सदाबंद'  टी व्ही  आणि  वेब   चैनेलचे  लोगो  सांगलीत पुढे
सरसावले जात  आहेत. पत्रकारा  पेक्षा  बोगस पत्रकारांचेच शासकीय कार्यालयात जादा
चालते. कारण  'अर्थपूर्ण; व्यवहार हे  बोगस लोकच करत असतात. शासनाने जरी ' पेड '
न्यूजवर बंदी आणली असली तरी,निवडणुक काळत प्रिंट  व  टी व्ही मिडीयात बातम्या
म्यानेज करून देतो, असे सांगाणारे एजेंट सुद्धा वाढलेत.बोगस पत्रकार हे 'एजंट' लोकांचे
कलेक्शन  करत आहेत. बोगस पत्रकारवर कारवाई करण्या पेक्षा अश्या बोगस लोकाना
मांडी घेवून बसण्यातच अधिकारी आणि आणि अन्य पत्रकार धन्यता मानत आहेत.
           एका  बोगस पत्रकाराने तर मला एक नवीन टी व्ही चैनेल मिळणार आहे, असे
सांगून क्यामेरा घेण्यासाठी एका बड्या नेत्याकडे साडेतीन लाख रुपयाची मागणी केली.
आहे एक  तर नेत्यांच्या  जीवावर क्यामेरा घेतला तर, तो पुढे कशी पत्रकारिता करणार
हे वेगळे सांगायला नकोच…  पण क्यामेरा दीड लाख रुपयाला येतो मात्र, या नेत्याकडे
टेंडर भरले ते साडेतीन लाख रुपयाचे.क्यामेराला दीड लाख रुपये आणि उरलेली रक्कम
हि म्यानेजमेंट करणार्या एजेंट च्या घश्यात जाणार आहे. त्यातच कोणत्याही नियमांचे
पालन नकारता  'पेड न्यूज'  देणारी अनेक 'साप्ताहिक'  सुद्धा या  बोगसगीरीत अग्रभागी
आहेत. 
         तर भानगडबाज पत्रकाराना कामावरून काढल्या नंतर ते मुंबईत अनेक टी व्ही 
चैनेलचे हुंबरे झिजवत आहेत. अनेक नेत्यांना शिफारस देण्यासाठी वैताग देत आहेत.
आगोदरच्या  भानगडी आणि  केलेले  गैरव्यवहार  मुंबईत  कळाल्यामुळे  कोण दारात
उभे करत नाहीत. मग नेत्यांना शिफारस देण्यासाठी वैताग देवून काय उपयोग होणार.

          तर दुसरी कडे सांगलीत 'पेड न्यूज' ला पर्याय म्हणून 'सुपारीबाजी' पत्रकारिता
उदयास येत आहे. ती  नुसती  समाजासाठी  मारक नाही  तर, संपूर्ण लोकशाही साठी
मारक ठरणार आहे.