बेरक्याचे पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण

मित्रानो,,२१ मार्च रोजी गुढी पाडवा होता.याच दिवशी बेरक्या सुरू होवून चार वर्षे पुर्ण झाली.
काय योगायोग होता...२१ मार्च रोजी गुढी पाडवा येणे,हा दुग्धशर्करा योग होता.त्या दिवशी मी गावाकडे गेलो होतो,त्यामुळं अपडेट करता आले नाही.परंतु त्याची कल्पना अगोदरच दिली होती.
असो,बेरक्याने अगोदरच मराठी मीडियात उंच गुढी उभा केली आहे.आता ही गुढी इतकी उंच गेली आहे की,विरोधकांना तिथंपर्यंत पोहचणे अशक्य आहे.बेरक्याला अडचणीत आणण्याचा अनेकांनी प्रयत्न गेले,परंतु त्यांचे हे प्रयत्न वाया गेला.बेरक्या सर्व अडचणीवर मात करून आपल्या सेवेत हजर आहे.
बेरक्या चांगल्यांचा मित्र आणि वाईटांचा कर्दनकाळ आहे.बेरक्याने या चार वर्षात अनेक चांगले आणि वाईट अनुभव घेतले.यातून बरेच काही शिकता आले.
स्वत:ची लढाई ही स्वत: लढाईची असते,हे आम्हाला माहित आहे,ज्यांनी मदत केली त्यांचे आभार,जे आम्हाला विसरले त्यांना देव सद्बुध्दी देवो...
पाचव्या वर्षात पदार्पण करताना एकच संकल्प...
बेरक्या आम्ही जिवंत असेपर्यंत सुरू राहणार...