धक्कादायक आणि आश्चर्यकारक!


"जग जिंकायला निघालेल्या" मोहिमेतील; राजकीय बित्तमबातमीची धुरा जणू आपणच फक्त सांभाळतो अशा भ्रमातील; फुटीरतावादी-संत्र्याच्या प्रदेशातील एका गोऱ्या-गोमट्या आशिकवीराची ही कहाणी!
हे महोदय पूर्वी कोठेतरी 'बाळ गंगाधर टिळक लोकशक्ति'त होते. जग जिंकतांना मध्ये एकदा भरकटून पुन्हा जग जिंकायला आले. आता त्यांना जणू 'फणसा'चे काटे बोचायला लागले आहेत. त्यांना "जय जय महाराष्ट्र" अशी साद घालावीशी वाटतेय. त्यासाठी त्यांनी त्यांच्यासारख्याच देखण्या, गोऱ्या-गोमट्या व "राष्टवादी" विचारांच्या ठाण्यातील "संघर्ष"वीराला प्रथम साद घातली. ठाणेकरांनी डायरेक्ट "बारामतीच्या राजा"शी संपर्क साधला. काकांनी स्वतः डान्सबारवाल्या शेठला फोन केला व "जग जिंकायला निघालेल्या" विदर्भवीराला "जय महाराष्ट्र" गौरवगान म्हणू द्यावे, असे सांगितले. त्याला राजकीय फडात दौडू द्यावे, असेही फर्मान "साहेबां"नी सोडले. मात्र "जगन्नाथ"भक्त असलेले डान्सबारवाले शेट्टी (सॉरी शेठ!) फ़क्त बघतो म्हणून निसटले. कुणालाही कसे "जय महाराष्ट्र"गान म्हणू द्यायचे? आणि "आशि" कशी ही शि"ष"टाई? "जाधवी" (सॉरी यादवी!) माजलीय का कुणीही कुणाचीही कुठेही शिफारस करायला? प्रत्यक्ष काकांनी फोन करून फर्मान सोडले तरी शेठ बधले नसल्याने विदर्भवीराचे अरमान मात्र चूर-चूर झालेत!


जाता - जाता :
 20 तारीख उजाडली तरी जय महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत...सर्व कर्मचारी आर्थिक अडचणीत....तरीही लांबे गेल्यामुळे अनेक जण जय महाराष्ट्रमध्ये जाण्यास इच्छुक