"सुनील जाधव यांची व्यथा त्यांचाच शब्दात ''


सर मी "सुनील जाधव "

जय महाराष्ट्र वाहिनी मध्ये गेली दोन अडीच वर्षे पासून ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. गेले तीन वर्षा पासून मी ठाण्यासह कल्याण,डोंबिवली, भिवंडी , उल्हास नगर अबरनाथ या ठीकानच्या हि बातम्या माझ्या ऑफिसला पाठवत आहे .मात्र या ठिकाणी जाण्यासाठी मला गाडी देण्याचे सागितले होते मात्र नवीन चैनल असल्याने मला गाडी देऊ शकले नाही त्यांही मला प्रवास खर्च देणार असल्याचे सागितले होते २ वर्ष त्यांही मला प्रवास खर्च व पगार नियमित दिला त्या नंतर कार्यालयात बदल झाल्याने नवीन टीम आली सुरवातीला जाती वाचक अडचणी त्यांही निर्माण केल्या मला मुद्दामून त्रास देणे सुरु केले मात्र तरीही मी माझे काम नियमित करत राहिलो शेवटी वयक्तिक राग काढण्य साठी मी ऑफिसला पाठवलेली बिले इनपुट हेड आनद गायकवाड हे माझे पाठवलेले बिल त्याचे कडे ठेवत व माझा प्रवास खर्च देत नसत कधी करी एखाद्या महिन्याचे बिल जिथे ५ हजारचे आहे तिथे २ हजार देत असे त्या नंतर कार्यालयातून गेल्या काही महिन्या पासून पूर्ण पाने हा प्रवास खर्च थांबण्यात आला हे प्रवास खर्च मिळत नसल्याने मला बातमी घटनास्थळी जाऊन बातमी कवर करणे शक्य होत नसायचे त्याच बरोबर बातमी पाठवण्यास लागणारे नेट बंद असल्याने मला बातमी पाठवणे आवगड जात होते तरी मी या परिस्थितीवर मात करत ९ महिने माझ्या स्वताच्या खर्चाने काम केले ९ महिन्या नंतर माझी आर्थिक परीस्थिती अत्यंत हालाकीची झाली त्या मुळे मला माझे काम बंद करण्यास भाग पडले आहे . याबाबत मी मैलच्या माध्यमातून वेळोवेळी ऑफिस मध्ये माहिती दिली या विषयी मी वरिष्ठांशी वेळोवेळी फोन वर हि बोललो त्या माझ्या ऑफिस कडून कोणत्याच प्रकारे मदत मिळाली नाही अखेरीस मी नोव्हेबर मध्ये पूर्ण महिना काम करून शेव्च्या दिवशी मध्ये माझे काम बंद केले त्या नंतर व काम सोडनार असल्याचे ऑफिसला कळवले जसे ऑफिसला मी काम सोडण्याचे समजले त्यांही मी मेहनत केलेल्या नोव्हेबर पासून आज गत मला पगार दिला नाही , नाही माझा प्रवास खर्च दिला pf सुद्धा दिला नाही मी गेले तीन महिन्या पासून अनेख मैल केले फोन वर बोललो ऑफिस मध्ये जाऊन हाथ जोडले तरी मला कोणत्याच प्रकारची मदत माझ्या कार्यालयातून मिळाली नाही आता मी सर्व प्रयत्न करून थकलो कोर्टात जाण्याचा विचार केला मात्र आता वकिलाची फीज देण्या करिता सुद्धा माझ्या कडे पेंसे उरले नाही कारण मी गेले ३ महिन्या पासून बेरोजगार आहे मला दुसर्या चैनल मध्ये कामास बोलवले होते मात्र जय महाराष्ट्र चैनल मधून मला लागणारे दस्तावेद देण्यात आले नसल्याने मला त्या ठिकाणी काम मिळाले नाही म्हणून मी आता येत्या १५ दिवसात जय महाराष्ट्रच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यास बसणार आहे तरी आपल्या कडून मला सहकार्य व मार्गदर्शन दयावा हि विनंती सोबत मी कश्या प्रकारे काम केले आहे त्याचा फोटो देखील पाठवत आहे
आपला विश्वासू
सुनील जाधव

09324373320 09664747470