थेट, अचूक, बिनधास्त मध्ये गळती सुरूच

मुंबई - शेट्टी अण्णांच्या थेट, अचूक, बिनधास्त मधली गळती थांबायचं काही नाव घेत नाहीए. दोन महिला अँकर्सनी  'जय महाराष्ट्र' केला.या दोघीही जग जिंकायला निघाल्या आहेत. त्रिकुटाच्या कारभाराला कंटाळून या दोघींनी 'कायबीएन'ची वाट धरली. या दोघींच्या आधी एका सिनीअर प्रोड्युसरनंही या त्रिकुटाबरोबर काम करण्यास नकार देत राजीनामा फेकून दिला.
थेट, अचूक, बिनधास्त मधील  तिघांकडे कसलंही व्हिजन नाही. फक्त चमकोगिरी करण्यातच यांना रस आहे. नेतृत्वगुण तर एकातही नाही. मुलाखतीचा फार्सही फुसका बारच ठरला. त्यामुळं 'नाव मोठं लक्षण खोटं' याची प्रचिती आली...यातल्या 'बीजेपी माझा'च्या पार्सलविरोधात खांडेकरांकडे तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळं त्याला रामराम करावा लागला. या 'बीजेपी माझा'च्या पार्सलनं शेट्टी अण्णाकडे येण्याआधी 'एक पाऊल पुढं' च्या डॉक्टरकडे चाचपणी केली होती. पण डॉक्टरनी त्याची डाळ काही शिजू दिली नाही...तो 'पुण्याचा भामटा'ही काही चमक दाखवू शकला नाही.आता शेट्टी अण्णा हे तीन पांढरे हत्ती किती दिवस पोसणार अशी चर्चा सुरु आहे.