निवेदन देणा-या अंबोजोगाईच्या पत्रकारांना सहआरोपी करा

अंबाजोगाई शहरात ब्लॅकमेल करणारी पत्रकारांची एक टोळी आहे.या टोळीतील म्होरके काल बीडच्या एस.पी. साहेबांना भेटायला गेले होते.त्यांनी एस.पी.साहेबांना एक निवेदन देवून हेड कॉन्स्टेबल संतोष चाटे आत्महत्त्या प्रकरणात पुण्यनगरीच्या अ.र.पटेल आणि विवेक सिंधुच्या अभिजीत जगतापचा काही संबंध नाही,असे निवेदन देवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवू नये,असे त्यात म्हटले आहे.
आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून आता यांना सहआरोपी करायला हवे.कारण हेड कॉन्स्टेबल संतोष चाटे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये पुण्यनगरी आणि विवेक सिंधुच्या पत्रकारांनी खोट्या बातम्या दिल्या म्हणून आपण आत्महत्त्या करत आहोत,असे स्पष्ट लिहिले आहे.सुसाईड नोटमध्ये सरळ सरळ  नावे लिहिले असताना, आरोपींना साथ देण्याचा आणि त्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न कायदेशीर गुन्हा होवू शकतो.
संतोष चाटे यांनी अत्यंत तरूण वयात आत्महत्त्या केलेली आहे.कारण स्पष्ट आहे.संतोष चाटे हा या पत्रकारांना आपला भाऊ वाटत नाही मात्र पत्रकारितेत दलाली करणारे,ब्लॅकमेल करणारे अ.र.पटेल आणि अभिजीत जगताप यांना भाऊ वाटले.हरामखोरांनो स्वत:ला थोडे लाजा.जनाची नाही तर मनाची लाज बाळगा.
एक तरूण पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी,त्यांचा लहान मुलगा आणि त्यांच्या परिवाराचे आसू या हरामखोरांना दिसले नाहीत,परंतु ब्लॅकमेल करणारा पत्रकार अ.र.पटेल आणि अभिजीत जगताप जेलमध्ये जाणार ही यांना काळजी वाटत आहे. चोराला, चोरांनी दिलेली ही साथ आहे.
एस.पी.साहेंबाना आमची विनंती आहे,अंबाजोगाईच्या ब्लॅकमेल पत्रकारांच्या दबावाला बळी पडू नका.गुन्ह्यात सहभागी असलेल्या पटेल आणि जगतापला ताबडतोब बेड्या ठोका आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून निवेदन देणा-या पत्रकारांना सहआरोपी करा.
अंबोजोगाईमध्ये दलाल आणि ब्लॅकमेल करणा-या पत्रकारांची टोळी निर्माण झाली आहे,ती उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आता पोलीस आणि जनतेची आहे.म्हातारी मेल्याचं दु:ख नाही,काळ सोकावतोय.