नेरुळ येथे पत्रकाराचाी गळफास घेऊन आत्महत्या

कामाचा ताण आणि कौटुंबिक प्रश्‍नांमुळे तरूण पत्रकार राहुल शुक्ल यांनी 18 मार्च रोजीच नेरूळ येथील आपल्या घराच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.गेली काही दिवस कौटुंबिक प्रश्‍नांनी त्रेस्त असलेल्या शुक्ल यांना अर्धांगवायुचा झटका देखील येऊन गेला होता.अतिमतः त्यांनी टोकाचा मार्ग अवलंबित आत्महत्या केली.दुःखाची गोष्ट अशी की,राहुल मिडियात काम करीत असताना देखील त्याच्या आत्महत्येची बातमी पत्रकारांना दोन दिवसांनी उशिरा समजली.आपण परस्परांपासून किती दुरावलो आहोत याचं हे उत्तम उदाहरण आहे.
राहुल शुक्ल यांना भावपूर्ण श्रध्दांजली.--