जिल्हा माहिती अधिकारी सानप यांच्या त्रासाला कंटाळून महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

उस्मानाबाद - उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा sms .महिला माहिती सहाय्य्क आशा बंडगर यांनी गुरुवारी रात्री माहिती संचालनातील वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील पत्रकारांना पाठवला आणि आपल्या राहत्या घरी काही औषधी गोळ्या घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज सानप हे आपणास मानसिक त्रास देत होते, तसेच रात्री १० पर्यंत ऑफिसमध्ये बसवून काम करून घेत होते, तसेच आपण घटस्फोटित असल्यामुळे वाकड्या नजरेने पहात होते, असा आरोप आशा बंडगर यांनी केला आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजता काम संपल्यानंतर आपण घरी गेले असता सानप यांनी, फोन करून मला न विचारता घरी का गेला म्हणून झापले आणि आताच्या आता ऑफिसमध्ये या म्हणून बोलावले. मी माझ्या मुलीला घेवून ऑफिसमध्ये गेले असता, सानप यांनी पाणउतारा केला तसेच मानसिक त्रास दिला त्यामुळे मी ऑफिसमध्ये बसून होते आणि मानसिक त्रासातून वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकारांना आपण आत्महत्या करीत असल्याचा sms पाठवला. तो sms वाचून सानप यांनी पोलिसांना बोलावले आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्धच खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे बंडगर यांनी सांगितले.
त्यानंतर रात्री १० नंतर घरी गेले असता, काही औषधी गोळ्या एकदाच घेतल्या त्यामुळे मला काही तास गुंगी आल्याचेही त्यांनी सांगितले..सानप यांच्याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही बंडगर यांनी सांगितले.

कामानिमित्त बोलावले - सानप
माहिती कार्यालयाचे काम रात्री उशिरापर्यंत चालते, बंडगर याना कामानिमितच ऑफिसमध्ये बोलावले होते, यावेळी अन्य कर्मचारी होते, पण बंडगर यांनी रागाच्या भरात आत्महत्या करत असल्याचा sms पाठवल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे सानप यांनी सांगितले.. आपण त्यांच्याशी कधीही वाईट वागलो नाही किंवा त्या भावनेने बोललो नाही असे सानप यांनी खुलासा केला आहे.





साभार 
Osmanabad live