जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्यामध्ये फेरबदल

औरंगाबाद - लातूरचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता थोरे यांनी बीडला जाण्यास नकार दिला, त्यामुळे थोरेंची बदली औरंगाबादच्या  मुख्य कार्यालयात करण्यात आली आहे. त्यानंतर बीडला   सतीश जोशी याची  नियुक्ती करण्यात आली आहे. जोशी यापूर्वी औरंगाबाद कार्यालयात कार्यरत होते. त्याचबरोबर बीडचे प्रताप नलावडे यांचा निर्णय पेंडींग ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे नांदेड विभाग पुन्हा औरंगाबादला जोडण्यात आला आहे. आता नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून शिवराज बिच्चेवार काम पाहतील.तेच नांदेडचे मुख्य राहतील. नांदेडचे हेड धर्मराज हल्लाळे यांची  लातूरला बदली करण्यात आली आहे. खास हल्लाळेसाठी लातूर आणि उस्मानाबाद हा वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे. हल्लाळे हेड तर जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के राहतील. सोनटक्के यांची उस्मानाबादहून लातूरला बदली करण्यात आली आहे. सोनटक्के हल्लाळेना रिपोर्टनींग करतील. उस्मानाबादला जिल्हा प्रतिनिधी म्हणून चेतन धनुरे याची नियुक्ती करण्यात आली आहे. धनुरे पूर्वी लातूरला रिपोर्टर होता. नंतर त्याची उदगीरला बदली करण्यात आली आहे. धनुरे यास पदोन्नती देण्यात आली आहे.


ताजा कलम

बीड - लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे यांचा राजीनामा... सतीश जोशी नवे जिल्हा प्रतिनिधी ...


यापूर्वीचे वृत्त 
लोकमतमध्ये जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्या
औरंगाबाद - भारतीय प्रशासनिक सेवा (Indian Administrative Services)अधिकाऱ्याच्या दोन वर्षाला जश्या बदल्या केल्या जातात, तोच फार्म्युला राबवत लोकमतने चार वर्षानंतर मराठवाड्यातील चार जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्या केल्या आहेत. या बदलीच्या ऑर्डर्स बुधवारी निघाल्या असून , बदली झालेल्या सर्व जिल्हा प्रतिनिधींना नव्या ठिकाणी १ जून पासून जॉईन व्हायचे आहे.
नांदेडचे जिल्हा प्रतिनिधी धर्मराज हल्लाळे याची लातूरला, लातूरचे दत्ता थोरे यांची बीडला, बीडचे प्रताप नलावडे यांची उस्मानाबादला आणि उस्मानाबादचे विशाल सोनटक्के यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे जिल्हा प्रतिनिधीमध्ये : कभी खुशी, कभी गम आहे...