भाऊंच्या कट कारस्थानाचा दुसरा बळी

औरंगाबाद - बाबूजींच्या  मानबिंदूत भाऊची मनमानी सुरूच आहे. त्यांच्या कटकारस्थामुळे प्रताप नळावडेनंतर दत्ता थोरेंचा दुसरा बळी गेला आहे. लातूरहून औरंगाबादला बदली केल्यानंतर दत्ता थोरेला न जमणाऱ्या बिटला काम करण्यास सांगण्यात आले.त्यामुळे अखेर थोरेंनी मानबिंदूस सोडचिठ्ठी दिली.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाऊच्या प्लॅननुसार जिल्हा प्रतिनिधींच्या बदल्यांचा खेळ  सुरू झाला. दत्ता थोरे यांची लातूरहून औरंगाबादच्या मुख्य कार्यालयात बदली करण्यात आली. त्यानंतर बदलीमुळे अस्वस्थ झालेल्या थोरेनीं दहा-बारा दिवसांची रजा टाकून पर्याय शोधण्यास सुरूवात केली. यानंतर औरंगाबादला जॉईन झाल्यानंतरही पहिल्यांदा त्यांना आॅनलाईनचे काम दिले आणि त्यानंतर दोनच दिवसात कामाचे स्वरूप बदलून ट्रान्सलेशनचे काम देण्यात आले. त्यानंतर सोमवारी थोरे यांनी राजीनामा दिला. भाऊला हेच अपेक्षित होते.

प्रताप नलावडे, दत्ता थोरे नंतर आता भाऊंच्या निशाण्यावर जालन्याचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे असून कोणत्याही क्षणी त्यांचा बळी जाऊ शकतो. दुय्यम स्थानावर पाठवून खच्चीकरण करण्यात आलेल्या विशाल सोनटक्के यांच्यासंदर्भातही भाऊ आणि भाऊने ठेवलेला दिवाण या दोघांचे प्लॅनिंग सुरू आहे. दिवाणशी पंगा घेणाºया चौघांचाही काटा काढणाऱ्या  भाऊच्या खेळ्या बाबुजींना कळत कशा नाहीत, याचेच आश्चर्य वाटते.एका बाजुला  बॅगा उचलणाऱ्या  दिवाणला प्रमोशन देण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या  भाऊंनी मानबिंदुत इमेज असणाऱ्या  लोकांनाच बाहेर जाण्यासाठी भाग पाडले आहे.