मानबिंदूत कर्मचाऱ्यांची सत्वपरीक्षा !

औरंगाबाद - दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल जाहीर होऊन  एकीकडे शाळा - महाविद्यालयात प्रवेशाची लगबग सुरु असताना, दोन मुलाचे बाप झालेल्या मानबिंदूतील उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक याना आज मानबिंदूने घेतलेली परीक्षा द्यावी लागली.
महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये गेली ५ ते १० वर्ष इमाने - इतबारे काम करूनही उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक यांची बुधवारी सकाळी १० ते १ या वेळेत शंभर मार्कांचा पेपर घेण्यात आला. कारण काय तर तुम्हाला पगार वाढ, पदोन्नती हवी असेल तर हा पेपर द्यावा लागेल आणि चांगले मार्क पडले ते पगारवाढ आणि पदोन्नती मिळेल अन्यथा नारळ भेटेल. नोकरी टिकवण्यासाठी बिचाऱ्यानी गेले काही दिवस अभ्यास करून पेपर लिहिला. ही परीक्षा नसून त्यांची घेतलेली सत्वपरीक्षा ठरली.

या परीक्षेमुळे अनेकांचा काळाजाचा ठोका चुकला. ज्यांनी पाच ते दहा वर्षे उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक म्हणून तुटपुंज्या पगारात शेटजीची चाकरी केली, त्यांची परीक्षा घेण्याचा घाट मानबिंदुत घातला  गेला. बुधवारी राज्यभरातील १४ सेंटरवर ही परीक्षा पार पडली. जवळपास २०० कर्मचाऱ्यांची ही  परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा वेळ होता तीन तास आणि परीक्षा हॉलमध्ये जाताना या सगळ्याचे मोबाईलही जप्त करण्यात आले. इमाने-इतबारे नोकरी करणाऱ्या  संपादकीय विभागातील लोकांवर आता मानबिंदुच्या व्यवस्थापनाचा विश्वास बसलेला नाही, हेच या परीक्षेवरून दिसते. ज्यांनी या लोकांना नोकरीला घेतले, त्या संपादकांवरही शेटजीचा विश्वास राहिलेला नाही.कोणाचे कधी दांडके उडेल, हे आता कोणीच  सांगू शकत नाहीत,
मजिठिया आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी देणे दूरच, यंदा पगार वाढ नाही आणि वरून परीक्षा घेऊन टांगती तलवार ठेवण्यात आल्यामुळे उपसंपादक, सहाय्यक उपसंपादक, वार्ता संकलक हवालदिल झाले आहेत. नापास झालो तर नारळ भेटेल या धास्तीने बिचाऱ्यानी कालची रात्र जागून काढावी लागली . आता परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी मानबिंदूत यानिमित्त अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

"मानबिंदूंच्या बाबूजींची उचलेगिरी"

महाराष्ट्राचा मानबिंदूचे बिरुद मिरवणा-या बाबूजींनी बुधवारी सगळ्या आवृत्यांमध्ये एकाच वेळी घेतलेल्या परीक्षेत खुद्द बाबूजींनीच उचलेगिरी करण्याचा विक्रम केलाय. तीन तासांसाठी घेतलेल्या या परीक्षेसाठी एकूण पाच प्रश्न विचारण्यात आले होते आणि या प्रश्नपत्रिकेतील विचारलेला शेवटचा प्रश्न इंग्रजी भाषांतरावर आधारित होता आणि बाबूजींनी थेट गुगल सर्च मारून इंग्रजीतला परिच्छेद जशाचा तसा उचलल्याने बाबूजींच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशीच कॉपी पेस्ट करायची होती तर परीक्षेचा घाट का घातला असा सवाल परिक्षार्थींनी उपस्थित केला आहे.
अधिक माहितीसाठी प्रश्नांची लिंक

https://goo.gl/d8J6rs