मानबिंदुतून १८६ जणांना नारळ

औरंगाबाद - मानबिंदूसाठी गेल्या पाच ते दहा वर्षापासून जीवाचे रान करून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऐनकेन कारणामुळे घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. परीक्षेच्या नावाखाली संपादकीय विभागातील एकूण ५२ जणांना तर सर्व डिपार्टमेंट मधील मिळून १८६ जणांना नारळ देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ही सर्व आकडेवारी मानबिंदूच्या सर्व आवृत्तीतील आहे.
 एकीकडे GST लागू होण्यापूर्वी मालकाचे चिरंजीव सव्वा दोन कोटी रुपयांची नवी  आलिशान गाडी खरेदी करून फिरत असताना दुसरीकडे काटकसरीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कपात करण्याचे धोरण सुरु आहे.
नोटाबंदीनंतर प्रिंट मीडियात आर्थिक मंदीचे दिवस आले आहेत. खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात सुरु आहे. मजिठिया आयोग लागू करावा म्हणून न्यायालयात एकीकडे आदेश देत असताना दुसरीकडे कर्मचारीच घरी पाठ्वण्याचा नवा फंडा सुरु आहे. ज्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले त्याना मागील सर्व फ़ंडही  देण्यात येत नाही. आपणास काय -काय फंड मिळतो यापासून कर्मचारी अज्ञानी आहेत. कर्मचारी मागील फ़ंड मागत नाहीत आणि मालकही देत नाही... जागो कर्मचारी जागो !

मानबिंदूतिल कर्मचा-यांना आणखी कोणते दिवस पहावे लागणार देव जाणे ?
मानबिंदूंच्या बाबूजींनी गेल्यावर्षी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या तसेच काही बातम्या न छापल्याने विशिष्ठ वर्ग दुखावला गेला. याचा विपरीत परिणाम सर्वच आवृत्यांच्या खपावर झाल्याने मानबिंदूंच्या बाबूजींनी वाचक वर्गा पर्यंत पोहचण्याचा दृष्टीने नामी शक्कल लढविली आहे. यात गेल्यावर्षी महिला दिनी प्रत्येक कर्मचा-याच्या हाती १० प्रमाणपत्रे थोपवून शहरातील महिलांना त्याचे वाटप करायला लावले. हेच कमी की काय म्हणून यावर्षी पितृदिनाला ज्येष्ठ व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन झाल्यानंतर आगामी गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कर्मचा-यांकडे झाडाचे रोपटे देऊन शाळा शाळांमध्ये जाऊन याचे वाटप करायला लावले आहे. त्यामुळे लोकमतच्या कर्मचा-यांना पत्रकारिता आणि बाबूजींनी सोडलेले फर्मान यापैकी काय निवडावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मानबिंदूंच्या बाबुजींचे उपक्रम जरी चांगले असले तरी तहान भूक जेवण आणि झोप विसरून असली कामे केली जात असल्याने मानबिंदूत कर्मचारी तग धरतील का हा प्रश्न कायम आहे.