सगळ्यांनी रिजेक्ट केलेले पुन्हा सामनात

मुंबई - काही वर्षां पुर्वी सामना सोडून गेलेले दोन सामना वीर पुन्हा सामना त परतले आहेत. विशेष म्हणजे या दोघांनाही सगळ्यांनी रिजेक्ट केले आणि पुन्हा सामना ने त्यांना पदरात घेतले आहे. 
 यातील एकाने प्रथम सकाळ मध्ये जाऊन पाहिले. पण तीथे चुरीदारपणा चालला नाही. पण वशिला लावला आणि मटा मध्ये उडी मारली. तीथे महापालिका आणि मंत्रालय बीट ची जबाबदारी देण्यात आली पणा पालिकेतील दुकानदारी उघड झाली तर मंत्रालयात काहीच जमेना म्हणून हेल्थ बीट च्या काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. ती भोगून आता  हा दादरचा शिलेदार सामनात परतला आहे. 
दुसऱ्या ची कहाणी तर मजेशीरच आहे. मटा मध्ये स्पोर्टस् बीट करणार्‍या या कोकणी माणसाला आपल्याला राजकीय चांगले कळते असा गर्व झाला आणि थेट राजकीय बातमीदारी मिळवली आणि सामना ते दिव्य मराठी असा दिव्य प्रवास केला.पण आडात नाही तर परबात कुठून येणार... प्रेसरूम मधे बसून काॅपी पेस्ट बातमीदारी करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या या कोकण विराला काॅस्टकटींगचा फटका बसला. अशा प्रकारे बेरोजगार झालेल्या आणि रिजेक्टेट केलेल्या या दोघांना अखेर सामना ने पदरात घातले आहे. कारण सामना लाही चांगली माणसे मिळत नाहीत त्यामुळे ते तरी काय करणार ?