जय महाराष्ट्र मध्ये गळती सुरू...

मुंबई - जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू झाली आहे.गेल्या एक महिन्यात  दहा ते बारा जणांनी चॅनलला " जय महाराष्ट्र" केला आहे. पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचारी सोडून जात असल्याची माहिती आहे.
सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वेदश्री ताम्हाणे, तन्मय टिल्लू, समीर सावंत, शिवाजी शिंदे, श्रेयस सावंत, रामनाथ दवणे, राजू सोनवणे, कृतिका पाटील, गौरी शिंदे, अंकिता शिंदे, सौरभ कोरटकर यांचा समावेश आहे. 
पॉलिटिकल रिपोर्टर मंगेश चिवटे याने नागपूर अधिवेशन संपल्यानंतर ऑफिसला तोंड दाखवले नाही.
तीन - तीन महिने पगार न होणे आणि त्यात वरिष्ठांकडून होणारी मुस्कटदाबी यामुळे गळती सुरू झाली आहे. भिकार वितरण आणि कंटेंट नसल्यामुळे चॅनेलचा टीआरपी 4 च्या पुढे सरकत नाही.येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने मालक शेट्टी त्रस्त आहेत.