ऋषी देसाई यांचा झी २४ तासला रामराम


मुंबई - झी २४ तास मध्ये गळती सुरु झाली आहे. गेल्या आठ वर्षापासून अँकर म्हणून कार्यरत असलेले ऋषी देसाई यांनी अखेर झी  24 तासला रामराम ठोकला आहे. झी  24 तासच्या ऑफिसमध्ये आजचा त्यांचा शेवटचा दिवस असल्याचं व्हाट्सअँप  स्टेटस सुद्धा त्यांनी ठेवलंय...

  शुगरे व काळूमामा यांच्या सततच्या मेलबाजी च्या त्रासामुळे ऋषी देसाई यांनी झी  24 तास सोडण्याचा निर्णय घेतला असावा , अशी चर्चा आहे.

दरम्यान , ऋषी देसाई टीव्ही ९ मध्ये जॉईन होत आहेत.



टीव्ही ९ मध्ये तीन कार्यकारी संपादक

निखिला म्हात्रे यांना पगार वाढवून तसेच पदोन्नती मिळताच त्यांनी टीव्ही ९ चा राजीनामा परत घेतला असून टीव्ही ९ मध्येच राहणे पसंद केले आहे. त्यांच्याकडे आता कार्यकारी संपादक पद असेल.

नुकतेच रुजू झालेल्या सुनील बोधनकर यांनाही कार्यकारी संपादक म्हणून घेण्यात आले आहे.

माणिक मुंडे यांनाही कार्यकारी संपादक करण्यात आले आहे.

एकाच चॅनल मध्ये तीन कार्यकारी संपादक पाहून टीव्ही मीडियात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टीव्ही ९ ला राज्य महिला आयोगाची नोटीस