'सनसनाटी बातम्यांपासून माध्यमांनी दूर रहावे'

नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करीत माध्यमांवर बाहेरून कोणाचे नियंत्रण ठेवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच माध्यमांनी सनसनाटी बातम्या देणे रोखले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, माध्यमांतील प्रतिनिधींनी कोणत्याही व्यक्तीबाबत भेदभाव न करता निष्पक्षपणे सर्वांचे वृत्तांकन केले पाहिजे. सनसनाटी बातम्या देण्याच्या मोहापासून त्यांनी स्वतःला रोखणे आवश्यक आहे. पेड न्यूज सारख्या चुकीच्या गोष्टींपासून भारतीय माध्यमे दूर राहतील, असा मला विश्वास आहे. माध्यमांनी स्वतःहून याबाबत पाऊले उचलली पाहिजेत आणि त्यात ते यशस्वी होतील.

पंतप्रधान आज ओडिशाची राजधानी भुवनेश्वरच्या दौऱ्यावर असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आज सायंकाळी ते भुवनेश्वला पोहचणार आहेत. मंगळवारी पंतप्रधान केआयआयटी विद्यापीठाच्या परिसरात ९९ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उदघाटन करणार आहेत.

Post a Comment

0 Comments