पत्रकारितेचा आगामी काळ कठीणच - गर्ग

पुण्यातील केसरी मराठा विश्वस्त ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक भास्करचे समूह संपादक र्शवण गर्ग यांना ट्रस्टचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते बुधवारी एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) मंजू गर्ग, र्शवण गर्ग, डॉ. टिळक, रोहित टिळक, एस. के. कुलकर्र्णी उपस्थित होते.
पुणे - इंग्रजांविरुद्ध स्वराज्य आणि स्वदेशीचा नारा देणार्‍या आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनमत जागृत करणार्‍या लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय पत्रकारितेचा पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्युच्च क्षण आहे, असे भावोद्गार दैनिक ‘भास्कर’चे समूह संपादक र्शवण गर्ग यांनी बुधवारी सत्काराला उत्तर देताना काढले. राजकारण आणि माध्यमांचा आजचा जो चेहरा दिसतो तो खरा नाही. सध्या माध्यमांवर सगळ्या प्रकारे अंकुश आणण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यामुळे पत्रकारितेसाठी आगामी काळ कठीण आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून दैनिक ‘केसरी’च्या वर्धापन दिनानिमित्ताने देशातील प्रतिष्ठित पत्रकारांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार र्शवण गर्ग यांना जाहीर झाला होते. पुणे येथील टिळकवाड्यातील पटांगणात आयोजित भव्य समारंभात केसरीचे विश्वस्त दीपक टिळक यांच्या हस्ते गर्ग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गर्ग यांच्या पत्नी मंजू गर्ग, मोहन धारिया, रोहित टिळक, शां. ब. मुजुमदार, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. नागनाथ धर्माधिकारी, दाजीकाका गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रणती टिळक यांनी गौरवमूर्तींचा परिचय करून दिला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर र्शवण गर्ग म्हणाले, आजच्या सोहळय़ाच्या निमित्ताने मला असे वाटते की, मी एखाद्या तीर्थयात्रेवर आहे. केसरीच्या निमित्ताने मी देशाच्या स्वातंत्र्याची तीर्थयात्रा करीत आहे. नारायण पेठेत स्वातंत्र्याच्या अनेक गाथा आहेत. मोनालिसाच्या चित्रातील रहस्य ज्याप्रमाणे उकलण्याचा प्रयत्न होत आहे त्याचप्रमाणे नारायण पेठेतील कथांचेही रहस्य उलगडले पाहिजे. 

कामाचे खरे मूल्यांकन झाले

गर्ग पुढे म्हणाले की, मी गेल्या 40 वर्षांपासून पत्रकारितेत आहे. माझ्या कामाचे कधी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने मूल्यांकन होईल असे मला वाटले नव्हते आणि मी कधी ते स्वप्नही पाहिले नव्हते. मात्र, आज माझ्या कामाचे खरे मूल्यांकन झाले, असे मला वाटते. या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेची आज खरी गरज असल्याचे मतही त्यांनी विशद केले.  

  
अक्षर वाड्मयचे प्रकाशन

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराबद्दल दीपक टिळक यांनी माहिती दिली. तसेच लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेचा आढावा घेत सध्या माध्यमापुढील आव्हाने त्यांनी याप्रसंगी विशद केली. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखावर आधारित व एस. के. कुलकर्णी द्वारा संपादित ‘अक्षर वाड्मय’ पुस्तकाचे प्रकाशनही र्शवण गर्ग यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले.
 

Post a Comment

0 Comments