आय.बी.एन.-लोकमतचा अखेर फुगा फुटला, एका झटक्यात ७० कर्मचा-यांना घरी पाठविले

मुंबई - आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळे आय.बी.एन.लोकमतने एका झटक्यात ७० कर्मचा-यांना कमी केले आहे.सहा महिन्यापुर्वी २० जणांना कमी करण्यात आले होते.केवळ सहा महिन्यात ९० जणांना घरी पाठविणारे आय.बी.एन.लोकमत म्हणजे बडा घर - पोकळवासा ठरले आहे.काही दिवसांपुर्वी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी नं.१ चॅनल असा दावा करणारे आय.बी.एन.लोकमत आता कर्मचारी काढण्यात नं.१ ठरले आहे, हेही नसे थोडके.
नेटवर्क १८ शी सलग्ल असलेल्या या चॅनलमध्ये आय.बी.एन.चे ५१ टक्के तर लोकमतवाल्या दर्डांचे ४९ शेअर्स आहेत.गेल्या चार वर्षापुर्वी या चॅनलची सुरूवात अत्यंत धुमधडाक्यात झाली होती. परंतु काही दिवसांतच या चॅनलचा फुगा फुटला. गतवर्षी राज्यातील काही ब्युरो ऑफीस बंद करण्यात आले.सहा महिन्यापुर्वी २० कर्मचा-यांना काढण्यात आले तर आता एका झटक्यात एकूण ७० कर्मच-यांना काढण्यात आले आहे.त्यात प्रॉडक्शन विभागाचे ४, आऊटपूटचे ५, इनपूटचे ५, कॅमेरामन १० असा समावेश आहे.संपादकीय विभागाचे १४ जण काढण्यात आले असून, त्यात अमृता दुर्वे, उदय जाधव, शशी मराठे, अजय वांडरे यांचा समावेश आहे. चॅनलची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. आता आय.बी.एन.- लोकमतमध्ये कर्मचारी गेले, साहेब उरले असे चित्र निर्माण झाले आहे.गेलेले सुटले आणि राहिलेले वाघाच्या जबड्यात अडकल्याचे एका कर्मचा-याचे म्हणणे आहे.

ताजा कलम : कर्मचा-यांच्या हिताच्या बेंबीच्या देठापासून पोकळ गप्पा मारणारे संपादक निखील वागळे चक्क आठ दिवसापासून रजेवर आहेत. कर्मचा-यांच्या  या प्रश्नांला कोण उत्तरे द्यावीत म्हणून ते तोंड लपवून घरी बसले आहेत.


जाता - जाता : चला जग जिंकूया .....असं म्हणत ..सहा एप्रिल २००८ ला सुरु झालेलं आय बी एन लोकमत ....सहा एप्रिल २०१२ लाच बंद होतं कि काय अशी अवस्था झालीये ........कारण आहे कोणत्याही चॅनल चा ''कणा''असलेल्या स्ट्रीजरस कडे वर्ष भरातच या चॅनल ने नंबर वन झाल्यावर पाठ फिरविली .......चॅनल मध्ये असलेले अंतर्गत राजकारण .......स्री लंपट पणा.......काही बडव्यांचे वरिष्ठांकडे असलेले लाळ घोटे संबंध ( ...एक ब्युरो कोस्ट कटींग मुळे बंद होतो ....त्यातील सर्व लोकं बेरोजगार होतात ....आणि त्याच ब्युरोतील एका विशिष्ठ माणसाला पदोन्नती मिळते ).....महाराष्ट् भरातील ब्युरो ऑफिस मधून काही मंडळींनी जमवलेली माया ...आणि चॅनल ला करून दिलेली कमाई .....हे सर्व या अधोगती चे मुख्य कारण आहे.........आगामी काळात जर चॅनल बंद झाले तर शेवटी एवढंच म्हणावं लागेल .....''दैव देते अन कर्म नेते''.......

Post a Comment

0 Comments