नवशक्तीने दिला दहा जणांना '' नारळ ''

मुंबई - "जनसामान्याची महाशक्ती" असलेल्या नवशक्तीने  परवाच १० कर्मचार्यांना " नारळ '' दिलाय ... सध्या नवशक्तीच्या वातावरणात कामगार युनियन आणि प्रशासन यात '' "कोल्ड वॉर" सुरु आहे. याची झळ कर्मचार्यांना पोहोचतेय .... 
परवा हे  कर्मचारी  नित्य नियमाने कामावर आल्यावर त्यांना सिक्यूरिटीने  संपादकीय विभागात जावू न देता एखाद्या गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देत दुसऱ्या माळ्यावरील एच. आर.  '' देशपांडे'' बाईंची गाठ घ्यायला सांगितली, आणि हे सगळे कोडे उलगडले . अचानक झालेल्या या प्रकारामुळे हे कर्मचारी  काहीसे सुन्न झालेत. मात्र , '' त्या '' दिवशी नवशक्तीच्या कार्यालयातहि वातावरण गढूळ होते. संपादकीय  विभागाच्या रुपाली पेठकर- जोशी, वैशाली कांबळे, सुजाता सोरटे, लहू सरफरे, सुशांत मोरे,  यांना कामावरून कमी करण्यात आले. कामावरून कमी करण्याचे कारणही काय? तर म्हणे ...'' आपल्याला १६ पानाच्या ऐवजी आता १४ पानच करायचीत ''
 असे फुटकळ कारणाने हे कर्मचारीही जरा चक्रावले. डीटीपी  विभागातील सुभाष कांबळेनाहि याचा फटका पडलाय. विचारे तसेच अंतिम आणि जितु या  दोघा शिपायांना देखील '' कामगार कपात '' च्या नावाखाली कमी करण्यात आले.   अचानक झालेल्या या प्रकारामुळे  "जनसामान्याची महाशक्ती"असलेला नवशक्तीचा निगरगट्ट पण पुन्हा एकदा अधोरेखित झालाय .....

Post a Comment

0 Comments