लोकमतच्या नवी मुंबईतील बलात्कारी वार्ताहराला दोन वर्षे सश्रम कारावास

पनवेलच्या आश्रमातील गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा ट्रस्टी रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. हा प्रकार 5 मार्च 2011 मध्ये उघडकीस आला होता. त्यापूर्वी वर्षभर हा अत्याचार सुरू होता. या आरोपींपैकी रामचंद्र व नानाभाऊ करंजुले हे आश्रमाचे ट्रस्टी असून बडदे अधीक्षिका होती. मावळेही या मुलींच्या देखभालीचे काम करत होती. या आरोपींवर भारतीय दंडसंहितेचे कलम 302 (खून), 307 (खुनाचा प्रयत्न), 354 (विनयभंग), 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक संभोग) आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. यातील नानाभाऊ करंजुले हा अनेक वर्षे लोकमताचा नवी मुंबई/पनवेल येथील वार्ताहर होता. हा सारा प्रकार सुरू असतानाही तो 'लोकमत'मध्ये आपल्या 'रंगीला औरंगाबादी'च्या छत्रछायेत होता. 'रंगीला'चा हा एकदम 'खास माणूस'! तो सारी काही सोय करायचा. त्यामुळे लाल कार नेहमी सानपाड्यातून रात्री-अपरात्री  केव्हाही  सानपाड्याहून पनवेलच्या दिशेने धावायची. नानाभाऊ करंजुलेने 'लोकमत'चा धाक दाखवित या प्रकरणाचा तपास दडपण्याचाही प्रयत्न केला होता. अखेर कायदाच सर्वश्रेष्ठ ठरला. न्यायसंस्थेचा विजय असो. नागपुरी शेठे आणखी किती दिवस संपादकांवर आंधळा विश्वास ठेवून असे बलात्कारी लांडगे आणि खंडणीबहाद्दर धेंडे कामाला ठेवतील देव जाणो. होउन जावू द्या एकदाची साफसफाई. काय होईला? एखाद दोन जाहिराती कमी मिळतील किंवा बातम्या चुकातील. पण समाज तुम्हाला धन्यवाद देईला; जसे आज न्यायसंस्थेला देतोय... करावी का शेठजी आपणाकडून महाराष्ट्राने ही अल्पशी अपेक्षा? मानबिंदू आहात ना आपण या महाराष्ट्राचे!

मूळ घटनेच्या विस्तृत माहितीसाठी खालील बातमी वाचा :
गतिमंद मुलींवर अत्याचार करणाऱ्यास फाशी