त.भा.चे वार्ताहर दिनेश चौधरी यांच्यावर ऍसिड हल्ला

परभणी - जिल्ह्यातील पूर्णा  जंक्शन येथील सोलापूर तरूण भारतचे वार्ताहर दिनेश सदाशिव चौधरी यांच्यावर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या घरात घुसून ऍसिड हल्ला केला.हल्लेखोराने दिनेश चौधरी यांच्या दाराची बेल वाजविल्यानंतर श्रीमती चौधरी यांनी दरवाज उघडला.त्याच वेळेस दिनेश चौधरीही बाहेर आले.ही संधी साधून हल्लेखोराने उभयतांवर ऍसिड फेकले.या ऍसिड हल्ल्यात दिनेश चौधरी आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांना पुढाल उपचारासाठी रात्रीच नांदेडला हलविण्यात आले आहे.
श्रीमती चौधरी या जास्त भाजल्या असून चेहरा आणि छातीवर हा हल्ला झाला आहे .राज्यात गुटका बंदी असली तरी पूर्णा येथे  गुटका सर्रास विकला जातो.त्याविरोधात दिनेश चौधरी यांनी सातत्यान आवाज उठविला.त्यामुळे ज्यांचे आर्थिक हितसंबंध दुखावले आहेत अशा प्रवृत्तीनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकारावर अशा प्रकारे ऍसिड हल्ला होण्याची महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पूर्णा बंदचे आवाहन करण्यात येत आहे.जिल्हा पोलिस प्रमुख आज पूर्णाला भेट देणार आहेत.पूर्णा येथील पत्रकार एस.पीची भेट घेऊन आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी करणार आहेत.पत्रकारांची अकरा वाजता बैठक होत आहे.पत्रकार चौधरी यांच्यावरील हल्लयाचा मनसेने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती लवकरच नांदेडला जावून जखमी पत्रकाराची भेट घेत आहेत.या संदर्भात गृहमंत्र्यांचीही भेट घेतली जाणार आहे.
दिनेश चौधरी हे 35 वर्षीय पत्रकार एक सामाजिक बांधिलकी जपत निष्टेने पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणून पूर्णेत ओळखले जातात.त्यांच्यावरील हल्ल्याने पूर्मा येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मागच्या आठवड्यातच सातारा येथील पत्रकार विशाल कदम याला आम आदमी पार्टीच्या मंडऴीनी मारहाण केली होती.ती घटना ताजी असतानाच पूर्णा येथील पत्रकारावर हल्ला झाल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.नव्या वर्षातील अडिच महिन्यातला म्हणजे 65 दिवसातला हा पंधरावा हल्ला आहे.म्हणजे राज्यात साडेचार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला केला जात आहे.गेल्या वर्षी हे प्रमाण पाच दिवसाला हल्ला असे होते.

साभार - उद्याचा बातमीदार
गुटखा तस्कराची मस्ती....!
गुटखा विक्रीच्या बातम्या छापल्या म्हणून परभणी जिल्ह्यातील पुर्णा इथल्या एका पत्रकाराच्या कुटूंबावर अ‍ॅसीड हल्ला करण्यात आलाय. यात पत्रकार दिनेश चौधरी त्यांची पत्नी अन मुलगी गंभीररित्या भाजली आहे. सध्या या तिघांवरही नांदेडच्या एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुर्णा हे मराठवाड्यातील महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. आंध्रप्रदेश अन कर्नाटकातुन मोठया प्रमाणात गुटख्याची तस्करी करुन तो पुर्णा इथ आनला जातो. अन पुर्णा इथून गुटखा राज्यभर पाठवल्या जातो. गेल्या काही दिवसापासून पुर्णात गुटख्याची मोठी तस्करी सुरू आहे. या संदर्भात पत्रकार दिनेश चौधरीने आपल्या वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून गुटखा तस्करानी पत्रकारांच्या कुटुंबावर अ‍ॅसीडचा हल्ला चढवला.या प्रकरणी पुर्णा पोलीसांनी तीन संशयीताना ताब्यात घेतलय.गेल्या काही दिवसापासुन पुर्णा हे गुटखा विक्रीचे मध्यवर्ती केंद्र बनलय. गुटखा तस्करानी रेल्वे पोलीसांच्या देखिल खोट्या तक्रारी केल्या आहेत. अन आता बातम्या छापणा-या पत्रकाराच्या कुटुंबावर थेट अ‍ॅसीड हल्ला करण्यापर्यंत तस्करांची मजल जातेय. या प्रकारानंतर पत्रकार दिनेश चौधरीचे कुटुंब कमालीचे भेदरलेल आहे. पुर्णा कॉंग्रेसचा शहराध्यक्ष सय्यद हसनने हा हल्ला घडवला असा आरोप जखमी पत्रकाराने केलाय.
शनिवारी परभणीत पत्रकारांचा मोर्चा 
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील सोलापूर तरूण भारतचे पत्रकार दिनेश चौधरी आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पऱभणीच्यावतीने परभणी येथे शनिवारी पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख या मोर्चाचे नेतृत्व कऱणार असल्याची माहिती पत्रकार हल्ला विरधी कृती समितीच्या पत्रकात देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गुटका बंदी असतानाही पूर्णा शहरात गुटका मोठ्या प्रमाणात विकला जात होता.त्यासंबंधीची बातमी दिनेश चौधरी यांनी तरूण भारतमध्ये दिली होती.त्यामुळे संतप्त झालेल्या गुटकाकिंगने चौधरीवर घरात जावून ऍसिडचा हल्ला केला यात ते आणि त्यांच्यापत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर सध्या नांदेडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.महाराष्ट्रात पत्रकारावर ऍसिड हल्ला होण्याची ही पहिलीच घटना असल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने याची गंभीर दखल घेत मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चात मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम.देशमुख.किरण नाईक,आसाराम लोमटे,हेमंत कौसडीकर,अशोक कुटे आदिंनी केले आहे.
महाराष्ट्रात सातत्याने पत्रकारांवर हल्ले होत आहेत.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच हे हल्ले होतात. चार दिवसांपूर्वी सातारा येथे आम आदमीच्या कार्यकर्त्यानी तेथील पत्रकारावर हल्ला केला होता.पुर्णेतील हल्ला प्रकरणातही शहर कॉग्रेसच्या अध्यक्षाचा हात असल्याचे पुढे येत आहे.राजकीय पक्षच हल्ले करीत असल्याने सरकार कायदा करायला तयार नाही.विरोधकांनी जेवढ्या प्रभावीपणे हा विषय लावून धरायला हवा तेवढ्या प्रमाणात तो धरला जात नाही.त्यामुळे महाराष्ट्रात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असतानाही सरकार कायदा करीत नाही त्यामुऴे कायद्यासाठीची ही लढाई अधिक तीव्र कऱण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकात देण्यात आली आहे.