पुढारीच्या भरतीकडे पाठ...जागा पाच आणि माणसे चार... तेही नवखे ...

मुंबई - रंगिला औरंगाबादीची किर्ती संबंध महाराष्ट्रात माहीत झाल्यामुळे तसेच जुना अनुभव लक्षात घेवून पुढारीच्या भरतीकडे पत्रकारांनी चक्क पाठ फिरविली.जागा पाच आणि मुलाखतीसाठी केवळ चारजण हजर होते.गंमत म्हणजे सर्वच्या सर्व नवखे...हे पाहून आणि ऐकूण आता हसावे की रडावे,असा प्रश्न निर्माण झालाय.

महाराष्ट्राच्या मानबिंदूतून हकालपट्टी झाल्यानंतर रंगिला औरंगाबादी पद्मश्रींच्या पेपरमध्ये रूजू झाला.मात्र वृत्तीत काही बदल नाही.सुंभ जळेल पण पिळ कायम...लोकमतच्या कारकिर्दीत एकूण ५० ते ६० जण सोडून गेले,आता पुढरीतही तीच बोंब.आतापर्यंत बाराजण सोडून गेले.आता अनेकांना कॉल करूनही माणसेच मिळेनात.मग साहेबांनी आपल्या फेसबुक वॉलवर जाहिरात टाकली.परिणाम शुन्य.मग शेवटी गेल्या काही दिवसांपासून पुढारीत जाहिरात झळकू लागली.वृत्तसंपादक (जागा १), मुख्य उपसंपादक (जागा १), वरिष्ठ उपसंपादक (जागा २) आणि आर्टिस्ट (जागा १) अशा एकुण पाच जागा. काल दि.८ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते.किमान पदवीधर आणि पाच ते १५ वर्षाचा अनुभव असलेले पत्रकार हवे होते.
ही जाहिरात वाचून,पुढारीपुढे रांग लागेल,असा रंगिला औरंगाबादीचा कयास.साहेब पाच वाजता येण्याऐवजी नेहमीच्या थाटात साडेसहा वाजता आले, पहातात तर काय, इनीमिनी चार लोक.तेही सर्वच्या सर्व नवखे.एकालाही एकवर्षापेक्षा जास्त अनुभव नव्हता.एक अलिबागहून आलेला तर बाकी सारे स्थानिक पेपरमधून आलेले.चार पैकी एकही नामांकित दैनिकातील नव्हता.हे पाहून साहेबांचा चेहरा पार काळवंडला.काय करणार,किर्तीच तशी ना.
महाराष्ट्राच्या मानबिंदूत असताना,माणसांची किती गर्दी. दररोज किमान चार जण, सर प्लीज,माझे काम करा ना...म्हणून आग्रह.काही देखण्या तर सर,प्लीज,प्लीज म्हणून....(ओठांचा चंबू) जवळ येत असत. पण इकडे सगळीच मारामार...घर फिरले की घराचे वासे फिरतात,ते काही खोटे नाही.
असो, आपण मूळ विषयावर येवू....पुढारीत एकूण जागा पाच आणि माणसे चार.तेही वृत्तसंपादक,मुख्य उपसंपादक,वरिष्ठ उपसंपादक या जागेला लायक नसलेला.आर्टिस्टची तर बोंबच.मुखाखतीसाठी आलेले सर्वच ट्रेनि सबएडिटर म्हणून ठेवण्याच्या लायकीचे.मग काय, आता करा स्वत:च उपसंपादकांची ड्युटी....तुम्हाला शुभेच्छा...कार्यकारी संपादक सोडून उपसंपादक झाल्याबद्दल...