
टीव्ही टुडे समूहाने आतापर्यंत 66 जणांना एकगठ्ठा
बाहेरचा रस्ता दाखविण्याऐवजी एकेकाला, वेगवेगळे कारण सांगून कपात चालविली
आहे. आश्चर्य म्हणजे, देश-परदेशातील अन्यायाला वाचा फोडणारे, अनेकांना
न्याय मिळवून देणारे हे सारे बुद्धधीजीवी पत्रकार स्वता:ची लढाई लढण्याऐवजी
गुपचूप ‘मुक्ती’पत्र स्वीकारून इतरत्र सोय पाहत आहेत. 150 जणांची कपात
होवूनही मीडियात संघर्षाचा ब्र शब्दही उमटू नये, हे मालकशाही मुजोर
झाल्याचे नव्हे तर; पत्रकार संघटना अत्यंत कमजोर व बटिक झाल्याचे लक्षण
मानले जात आहे. अलीकडेच ‘फोबर््स इंडिया’ने एका झटक्यात संपादक इंद्रजित
गुप्ता यांच्यासह चौघा वरिष्ठ पत्रकारांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखविला. या
अपमानास्पद प्रकाराबाबत मुंबईतील प्रेस क्लबच्या पत्रकबाजीऐवजी इतरत्र
कुठे काही बोंबही झाली नाही.
टीव्ही टुडे समूहाने आपला तोटा कमी करण्यासाठी अलीकडेच
26 टक्के भागभांडवल आदित्य बिर्ला समूहाला विकले. 2009 मध्ये 32 कोटींच्या
नफ्यात असलेला टीव्ही टुडे समूह वाढत्या स्पर्धेत अवघ्या तीन वर्षांत
तोट्याच्या दलदलीत फसला आहे.
कंपनीच्या द्ृष्टीने नॉन प्रॉफिटेबल अॅसेटस ठरवून
150 जणांच्या बरखास्तीचा डाव तडीस नेला जात आहे. त्यातील 50 टक्के काम तसे
पूर्णही झाले आहे. यात सीनियर आणि ज्युनियर सर्व कर्मचारी; एडिटोरियल,
पीसीआर, एमसीआर, मार्केटिंग, एडिटिंग, आयटी, कॅमेरामन सहीत अनेक विभागातील
मंडळी समाविष्ट आहेत.