गृहलक्ष्मीच्या माजी संपादिका जगताहेत, फुटपाथवर आयुष्य...

आयुष्यभर जगाची उठाठेव करणाऱ्या पत्रकारांच्या उत्तर आयुष्यात कोणत्या दिव्याला सामोरं जावं लागतंय याचं एक उदाहऱण जनसत्ता एक्स्प्रेस नावाच्या हिंदी वेबसाईटनं समोर आणलं आहे.
सुनीता नाईक नावाच्या महिला पत्रकाराची ही कहानी आहे.सुनीता नाईक या कधी काळी गृहलक्ष्मी या मासिकाच्या मराठी आवृत्तीच्या संपादिका होत्या.नोकरीत असताना त्यांच्याकडं स्वतःाचं घर होतं,पैसे -अडके होते पण आज त्यांच्यावर नयतीनं अशी वेळ आणली आहे की,त्या थेट रस्त्यावर आल्या आहेत,मुंबईतील वर्सेवा भागातल्या जेपी रोडवर असलेल्या एका गुरुव्दाराच्या बाहेर असलेला फुटपाथ हेच त्यांचं घर बनलं आहे.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्या जीवन जगत आहेत.

लहानपणीच त्यांचे आई-वडिल वारले,पुण्यात त्यांचे शिक्षण झाले.तेथे त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खास महिलांसाठी असलेल्या गृहलक्ष्मी या मासिकाच्या त्या संपादिका झाल्या.80च्या दशकाच्या सुरूवातीचा तो काळ होता.नोकरीच्या काळात त्या प्रभादेवी भागातील जयंत अपार्टमेंटमध्ये स्वतःचा फ्लॅट घेऊन राहात होत्या.मात्र काही वर्षांपूर्वी गृहलक्ष्मी बंद पडले आणि नाईक बेकार झाल्या.घर, गाडी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली.त्यानंतर त्या ठाण्यात भाड्यानं घेतलेल्या एका बंगल्यात राहू लागल्या.आज-उद्या नवी नोकरी मिळेल या आशेवर राहणाऱ्या नाईक यांच्याजवळचे सर्व पैसे संपत आले आणि एकवेळ अशी आली की,कफल्लक झालेल्या सुनीता नाईक बंगल्यातून थेट रस्त्यावर आल्या.गेल्या दोन महिन्यापासून फुटपाथ हाच त्यांचा आशियाना झाला आहे.सुनीता नाईक आजही स्वाभिमानी आहेत.कधी काळी त्यांच्याबरोबर काम केलेल्या सहकाऱ्यांनी काही मदत देऊ केली तर सविनय ती नाकारतात.पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या सुनीता नाईक यांची आज झालेली अवस्था हा पत्रकारितेचा खरा चेहरा आहे असे आम्हाला वाटते. सरकारने सुनीता नाईक यांच्यासाठी त्याचं पुढील आयुष्य तरी सुखानं जाईल असं काही केलं पाहिजे ही आपली मागणी आहे. सुनीता नाईक रस्त्यावर आल्या आहेत अनेक वयोवृध्द पत्रकार भलेही फुटपाथवर आले नसतील पण त्यांची अवस्था सुनीता नाईक पेक्षा कमी नाही.आम्ही पत्रकार पेन्शनची मागणी करतो आहोत ती वृध्दावस्थेत तरी पत्रकारांना सन्मानाने दोन वेळचे जेवण तरी मिळावे.मात्र गरज नसताना स्वतःचे पगार भरमसाठ वाढवून घेणारे आमदार पत्रकारांनी पेन्शन मागितली की,यांना काय गरज आहे असे म्हणत विषय टोलवून लावतात.पत्रकारांना पेन्शनची गरज का आङे हे सरकारला किमान वरील फोटो पाहून तरी कळावे हीच अपेक्षा आहे.सरकारने पत्रकारांना ताबडातोब पेन्शन मंजूर केली पाहिजे.आमदारांना दिल्या गेलेल्या पेन्शनवाढीच्या विरोधात आम्ही याचिका मंगळवारी दाखल करतो आहोतच.

 Batmeedar....



गृह गेलं लक्ष्मी रुसली

काळाचं चक्र कधी उलटं फिरेल याचा नेम नाही... कधी रंकाचा राजा होतो... तर कधी राजाचा रंक... अशीच एक कहाणी एका संपादिकेची... पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट....