खडस आणि केरकर यांचा दिव्य मराठीला रामराम

मुंबई - दिव्य मराठीच्या संपादकपदी प्रशांत दीक्षित यांची निवड झाल्यापासून मुख्य संपादक कुमार केतकर गटाची हवा टाईट झाली असून,दिव्य मराठीतून नारळ मिळण्यापुर्वीच दोघांनी दिव्य मराठीचा राजीनामा दिला आहे.
दिव्य मराठीच्या संपादकपदी प्रशांत दीक्षित यांची निवड झाल्यापासून, मुख्य संपादक कुतार केतकर गटांत अस्वस्थता निर्माण झाल्याचे वृत्त बेरक्याने यापुर्वी दोनदा प्रसिध्द केले होते.केतकर गटाच्या दोघांची विकेट पडणार असल्याचे संकेतही बेरक्याने दिले होते.अखेर हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.म.टा.तून आलेले समर खडस दिव्य मराठीत पॉलिटिकल ब्युरो तर लोकसत्तातून आलेले प्रसाद केरकर फिचर एडिटर म्हणून काम पहात होते.खडस आणि केरकर या दोघांनीही नारळ मिळण्यापुर्वीच दिव्य मराठीचा राजीनामा दिला आहे.
समर खडस लवकरच लोकमतमध्ये राजकीय संपादक म्हणून तर प्रसाद केरकर कृषीवलमध्ये संपादक म्हणून जॉईन होणार आहेत.
केरकर कृषीवलच्या वाटेवर असल्याचे वृत्त बेरक्याने यापुर्वीच दिले होते