नागपुरात वृत्तपत्र बंद पडण्याचा ट्रेंड

नागपूर टाईम्स/पत्रिका हे दोन इंग्रजी व मराठी वृत्तपत्र बंद पडल्यानंतरनागपुरात वृत्तपत्र बंद पडण्याचा एक ट्रेंड सुरू झाला होता. वृत्तपत्रचालू करणे व मनाला वाटेल तेव्हा बंद करण्याचा प्रघातच पडला होता.नागपूरटाइम्स/पत्रिकेचे मालक नरेश गद्रे यांचे सारवाडीजवळ एका अपघातात निधन झाल्यानंतर त्यांचे मित्र असलेले शरद पवार यांनी या वृत्तपत्रांना आधार देण्यासाठी स्वत:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विदर्भातील ज्ञानयोगी मधात कलमडले व त्यांनी शरद पवारांऐवजी स्वत: या वृत्तपत्रांची मालकी स्वत:कडे घेतली. ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांचाही या वृत्तपत्रांमध्ये मुक्त संचार झाला. त्यांनी आपले सासरे सपकाळ यांना व्यवस्थापक म्हणून आणून बसविले. या कंपुमध्ये जे आधी जिचकारांचे प्रसिद्धीपत्रक वृत्तपत्रांमध्ये घेऊन जायचे व पत्रकारांसमोर दीनवाणे उभे राहायचे अशा कार्यकर्त्यांना तर मग जोरच चढला. ते पत्रकारांना मग सालदारासारखे वागवायला लागले. ‘झिरो बजेट’मुळे प्रसिद्धीस आलेले श्रीकांत जिचकार यांनी आधी अनेकांच्या आयुष्याचे बजेट झिरो केल्याचा इतिहास असतानाही ते ज्ञानयोगी असल्याने नागपूर पत्रिका/टाईम्सला भरभराटीस नेतील, अशी सर्वांना अपेक्षा होती.
त्यामुळे इतर वृत्तपत्रातील अनेक वरिष्ठ पत्रकारांनी नागपूर पत्रिकेत धाव घेतली. यात जनवादमधून पांडुरंग कोल्हे, तरुण भारतातून विनोद देशमुख, प्रकाश देशमुख व मिलिंद ठेंगडी यांनी प्रवेश घेतला. ज्ञानयोग्याच्या
सान्निध्यात आपले भाग्य फळफळेल अशी त्यांना अपेक्षा होती. तसेच तिथे असलेल्या कर्मचाºयांनाही आता सुखाचे समाधानाचे दिवस येतील, अशी आशा वाटत होती. रामदासपेठेतील आज जिथे ‘तुली इम्पिरीयल’ हे पंचतारांकित हॉटल उभे आहे तिथे नागपूर टाइम्स/पत्रिकेची प्रेस होती. स्वातंत्र्य संग्राम सैनिक
अनंत गोपाळ शेवडे यांनी लावलेल्या या रोपट्याचा विस्तार होत ‘गगणावरी वेलू’ जाईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. असे झाले असते तर आज ‘तुली इम्पिरियल’ असलेल्या ठिकाणी नागपूर टाइम्स भवन ही १४ मजली इमारत उभी असती. तशी जिचकारांचीही योजना होती. परंतु नियतीला मात्र हे मान्य नव्हते. या ज्ञानयोग्याच्या मागे उभे असलेल्या ‘विषाणू’ंची लागण टाइम्स/पत्रिकेला झाली. हा व्हायरस मग इतरही वृत्तपत्रात पसरत गेला. जिचकारांच्या समर्थकांचा धुडगूस वृत्तपत्रात सुरू झाला. कोरडेसारखी मंडळी जिचकारांच्या सासºयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पत्रकारांना अपमानास्पद वागणूक द्यायला लागली. याची माहिती जिचकारांपर्यंत पोहोचतच नव्हती. त्यांची सातत्याने दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे त्यांनी एकदा संपादकीय विभागात बोलताना संतापून म्हटले होते, ‘मी मासळीसारखा यातून बाहेर पडेन’. वृत्तपत्र बंद केल्याने माझ्यावर काही फरक पडणार नाही. परंतु........... कोरडे कंपूच्या जाचामुळे हरफनमौला पत्रकार व सहायक संपादकपदावर असलेले शरद देशमुख यांचे हृदयविकाराने निधन झाले. महात्मेही यांच्या मनमानीमुळे पत्रिकेबाहेर पडले. तर मुख्य संपादक असलेले प्रभाकर पुराणिक मात्र अपमान
सहन करीत तिथे टिकून राहिले. कालांतराने त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. शेवटी नागपूर टाइम्सचे संपादक बाबासाहेब नंदनपवार यांच्याकडे मराठी वृत्तपत्राचीही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
पत्रकारांना मानसिक दिल्यानंतर या कंपूने नंतर प्रिटिंग प्रेस देशी दारुच्या दुकानाजवळ नेण्याचा प्रयत्न सुरू केला. यानंतर मग आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळीही कोरडे कंपूने आपल्या पद्धतीने आंदोलन हाताळले.
जिचकारांना यातले काहीच माहित नव्हते. हा सर्व प्रकार त्यांच्या समर्थक व जवळच्या नातेवाईकांचा होता.