वागळेंचे महाराष्ट्र १ चॅनल गांधी जयंतीपासून दिसणार...

निखिल वागळे यांच्या येवू घातलेल्या महाराष्ट्र १ न्यूज चॅनलबद्दल सध्या महाराष्ट्रात चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया येत आहेत.काहींच्या मते चॅनलची चर्चा होईल पण टीआरपी मिळणार नाही,कारण आयबीएन -लोकमत जेव्हा सुरू झाले तेव्हा दोन वर्षे टीआरपी मिळाला नव्हता.तेव्हाही वागळे होतेच.आता तर वागळेंकडे तेवढा पैसाही नाही.काहींच्या मते आर्थिक अडचणीमुळं हे चॅनल लवकरच डबघाईस येईल.या चॅनलच्या निमित्ताने निखिल वागळे यांचा कस लागणार आहे.
महाराष्ट्र १ चॅनलचा परवाना व्हीआयपी ग्रुपचा असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या हिंदीमध्ये व्हीआयपी चॅनल आहे.त्यांचाच हा परवाना आहे.महाराष्ट्र १ ची पडद्यामागील सर्व सुत्रे संदीप चव्हाण हालवत आहे.चॅनलसाठी आर्थिक फंड गोळा करण्यासाठी संदीप चव्हाण,संजय शर्मा,बिरेन कंसारा हे तिघेजण अनेकांशी संपर्क साधत असल्याचे बेरक्या सुत्राकडून सांगण्यात आले.या चॅनलमध्ये कॉन्ट्रक्टर नरेंद्र पाटील,सुनील झव्हर तसेच अनंत कोल्हे यांनी सध्या पैसा गुंतवल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.आतापर्यंत १० ते १२ कोटी रूपये जमा झाल्याचे सांगण्यात आले.
या चॅनलच्या स्टुडिओचे काम लोअर परेलमधील सिताराम मिल कंपाऊंडमधील त्याच बिल्डींगमध्ये सुरू आहे.१ सप्टेंबरपासून या चॅनलची चाचणी सुरू होणार असून,२ ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी चॅनल प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्याचे जागृती चॅनल पाच कोटीच्या आत सुरू झाले होते.जागृतीने कोठेही ब्युरो ऑफीस केले नव्हते किंवा ओबी व्हॅन घेतली नव्हती.महाराष्ट्र १ ची वाटचालही तशीच आहे.
महाराष्ट्र १ चॅनल पुणे वगळता कोठेही ब्युरो देणार नाही.सगळीकडे स्ट्रिंगरनियुक्त करणार आहे.तेही फुकट हवे आहेत.स्टुडिओमध्ये १२० माणसांची गरज असताना फक्त ९० माणसे नियुक्त करण्यात येणार आहे.काटकसरीवर भर राहणार आहे.
दुसरे असे की,या चॅनलमध्ये जास्तीत जास्त डिबेट शो होणार आहेत.त्यामुळं सबकुछ वागळे राहणार आहेत.