वटवागुळमुळे 'कलमनामा' बाहेर


मुंबई - 'आता जग बदलेल'मध्ये 'वटवागुळ'ची नित्तिमत्ता बदलली आहे.त्याने आपला अनेक वर्षापासूनच मित्र 'कलमनामा'चा पदोपदी अपमान केला,त्याची सारी स्टोरी बेरक्याने दिली आहे.अखेर 'कलमनामा'ने 'आता जग बदलेल' सोडून नवं जग शोधनं सुरू केलं आहे.
'कलमनामा' आणि 'वटवागुळ' तसे जुने मित्र.'आता जग बदलेल'च्या निमित्ताने एकत्र आले,परंतु 'वटवागुळ'ने पदोपदी अपमान केल्याने 'कलमनामा' आठ दिवसाच्या रजेवर गेला होता.आठ दिवसानंतर जेव्हा कलमनामा ऑफीसमध्ये आला,तेव्हा वटवागुळ म्हणाला,'तुला काय वाटले,मी तुझी मनधरणी करेन,तू आलाच कश्याला ऑफीसला,तुला काहीच काम जमत नाही,तेव्हा तू येथे न थांबणे योग्य आहे !
त्यानंतर 'कलमनामा'ला काय बोलावे कळेनासे झाले आणि तो आल्या वाटेने परत गेला.चार दिवस झाले,तो ऑफीसला परत आलेला नाही.'कलमनामा'ने 'आता जग बदलेल' सोडल्यात जमा आहे.इतका घोर अपमान आयुष्यात कोणी केला नसेल,तितका अपमान वटवागुळने केला.तरीही 'कलमनामा'चे 'कलम' चालत नाही.इतराने कोणी काय म्हटले असते,तर 'कलमनामा'चा 'कलम' चालला असता.
असो,'कलमनामा'नंतर 'आता जग बदलेल'ला आणखी झटका बसला आहे,अँकर पंकजने चॅनल सोडून पुण्यात टीव्ही मीडियात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

वटवागुळ को गुस्सा क्युं आता है ?
'आता जग बदलेल'मध्ये सकाळी आठ वाजता लाइव्ह विथ ...बरोबरचा अँकरला कोणीच साथ देत नसल्यामुळे त्याने आपला शो बंद केला,तेव्हा वटवागुळचे या अँकरबरोबर 'मला न विचारता शो बंद का केला? म्हणून कडाक्याचे भांडण झाले आणि वटवागुळ रागारागाने आणि तावातावाने घरी निघून गेला होता.
रात्री होणारा आजचा सवाल कार्यक्रमाला सुध्दा तो आला नाही.अखेर तो शो त्याच अँकरने केला .तो अँकर 'वटवागुळ'चा पंटर असल्यामुळे ते वादळ पेल्यातील ठरले.बहुतांश अँकर,रिपोर्टरला छोट्या छोट्या कारणावरून वटवागुळ अपमान करत असल्याने अनेकजण त्रस्त झाले आहेत.त्यामुळे अनेकजण सोडण्याच्या तयारीत आहेत.